Friday, 3 October 2014

मोदीजी - तुम्हारा चुक्याच!

[भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना अनावृत्त पत्र]

==============================


प्रिय प्रधानमंत्री मोदीसाहेब, 

अहो काय हे? आमचा पुरता भ्रमनिरास केलात की हो तुम्ही! तुमची लोकसभा निवडणुकीच्या वेळची भाषणे आम्ही खूपच मन लावून ऐकायचो, विशेषतः तुमचे ते 'अच्छे दिन आयेंगे' आम्हाला भारी आवडायचे. आम्हाला वाटायचे की जसे तुमच्या पक्षात सत्तेचे कमळ फुलले तसे आमच्याही जीवनात सुख, समृद्धी, आराम आणि शांततेचे कमळ फुलेल. तुम्ही जेंव्हा "सबका साथ, सबका विकास" म्हणायचात तेंव्हा आम्हाला वाटायचे की तुम्ही सर्व विरोधकांना बरोबर घेऊन आमचा विकास करणार. परवा १५ ऑगस्टला पण तुम्ही लाल किल्यावरुन केलेल्या भाषणात "मी जनतेचा प्रधान सेवक आहे" असे म्हणालात, त्यामुळे आम्ही जाम म्हणजे जामच खूष झालो होतो. 

पण परवा २ ऑक्टोबरला तुम्ही जेंव्हा स्वच्छता अभियानाची सुरुवात केलीत तेव्हा कुठे आम्हाला कळले तुम्हाला अभिप्रेत असलेल्या "सबका साथ" मध्ये आम्ही पण आलो म्हणून; आणि आमचा पूर्ण भ्रमनिरास झाला. तुम्ही राव आमच्या long week end ची मजाच घालवलीत, हे काही बरे नाही, अगदीच असह्य झाले म्हणून हा पत्र प्रपंच. 


कित्ती कित्ती plans केले होते आम्ही ही सुट्टी आणि थोड्याच दिवसात येणारी दिवाळीची मोठी सुट्टी enjoy करण्याचे. पण आत्ता तुम्ही जणू फर्मानच काढले आहे की प्रत्येकाने वर्षाचे १०० तास म्हणजे एका आठवड्याचे २ तास स्वच्छतेला द्यायचे म्हणून! अहो, तुम्हाला काय माहिती की आम्हाला इथे xxवायला सुद्धा वेळ नसतो. तुमचे एक बरे आहे, तुम्ही पडलात अविवाहित (कागदावर नव्हे पण प्रत्यक्षात), तुम्हाला ना बायकोचा त्रास ना मुला-बाळांचा. आमचे तसे नाही, आम्ही जरी सरकारी कर्मचारी असलो तरी ऑफिसमध्ये आमचे काम सोडून आम्ही किती महत्वाची कामे करत असतो उ. दा. लोकांचे ग्रुप्स जमवून गप्पा झोडणे, त्यांना फुकटचे सल्ले देणे - कुठे investment करायची आणि कुठे नाही, दोनाचे-चार आणि चाराचे-आठ कसे करायचे, याशिवाय ऑफिसमधल्या साहेबाची लफडी, इतरांचे आतले आणि बाहेरचे उद्योग, week end destination कुठले छान आहे, गटारीचे plans, वगैरे वगैरे. शिवाय जर एक-दोन दिवस रजा घेतली की टेबलावर अशी धूळ साठते की ती आमची आम्हालाच झटकायला लागते (आमचे चतुर्थ श्रेणीतले सफाई कर्मचारी आमच्याकडे सह्या मारून शेजारच्या दुकानात कामाला जातात). या सगळ्यात आमचे ८ तास कसे जातात कळतसुद्धा नाही. मग दमून-भागून ६/६:३० ला घरी आल्यावर बायकोच्या हातचा गरम गरम चहा पिऊन जरा शीण घालवायचा, टी. व्ही. वर बातम्या, मनोरंजनाचे कार्यक्रम बघून होईपर्यंत १० वाजतात. त्यापुढे वेळ राहिला व उत्साह वाटला तर मुलांची थोडी फार चौकशी करायची. म्हणजे किती busy routine असते बघा. तरी शनिवार-रविवार सुट्टी असते म्हणून family साठी जरा तरी वेळ देता येतो, बायको-मुलांना घेऊन कधी E-Square मध्ये सिनेमाला जा, कधी मॉल मध्ये खरेदीला जा, तर कधी एखादा week end गाडी काढून picnic ला जा, भरमसाठ कामे हो! आता सांगा या सगळ्या आवश्यक कामांमधून देशाची स्वच्छता करायला वेळ होईल का? तुमचे आपले काहीतरीच!

हे दुःख आमचेच नव्हे तर आमच्या समस्त मित्रांचेही आहे. आमचा मित्र-परिवार खूप मोठा आहे, त्यात वकील, डॉक्टर, आर्किटेक्ट, इंजिनीअर, लेखापाल, व्यावसायिक, प्राध्यापक, बँकेचे कर्मचारी, IT वाले,  लेखक, पत्रकार, नाटक-सिनेमावाले, माध्यम-तज्ञ, इ. बरेच आहेत. 

आता वकिलांचेच घ्या ना, किती कष्ट करतात बिचारे होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करायला. ह्याचे वकीलपत्र घ्यावे तर दुसरा मारण्याची भीती; अशा दबावाखाली काम करण्याचे वेगळे पैसे सुद्धा मिळत नाहीत. भर उन्हाळ्यात काळा डगला घालून घामाघूम होत काम करायचे म्हणजे काय चेष्टा आहे? अशिलांचा दबाव असतो तो वेगळाच. मजबुरी का नाम वकील असे म्हणायची वेळ आली आहे. पोटासाठी काय काय करावे लागते तुम्हाला कल्पना नाही. अशा परिस्थितीतून त्यांनी कसे २ तास द्यायचे दर आठवड्याला?

आमचे एक लेखक मित्र आहेत. कधी नाटके तर कधी टी. व्ही. सिरीअल्स, कधी सिनेमा लेखन तर कधी वर्तमानपत्रातून तिरक्या रेघा मारत असतात. त्यांच्या नावाच्या आद्याक्षरांमध्येच "सं. प." असल्याने ते वरील गोष्टींव्यतिरिक्त कधीच काही करत नाहीत. त्यांचे समविचारी लेखक-पत्रकार मित्रांचे टोळकेही तसेच आहे. या लोकांना भारतात काही चांगले चालले आहे असे मुळी वाटतच नाही. यांचा बराचसा वेळ विरोधकांची उणीदुणी काढण्यात जातो. बरं, हे स्वतः काही करणार नाहीत, दुसर्याला उपदेश देणार - कधी फुले जयंतीला तर कधी आंबेडकर जयंतीला. आजकाल २० ऑगस्टला पुण्यातील बालगंधर्व पुलावर जमून निदर्शने करतात. एवढ्या सगळ्या व्यापातून तुमच्या अभियानामागची भूमिका समजून घ्यायला वेळ कुठे आहे? आणि कळली तरी मान्य कसे करणार? अशा संभ्रमावस्थेतून ते मग स्वच्छता करण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. 

आमचे डॉक्टर मित्र तर already वैतागलेत! अहो आजकाल जो उठतो तो यांच्याकडे संशयाने बघतो. कोणी म्हणतो Cut Practice करतात, कोणी म्हणतो यांचे racket आहे. आजकालची परिस्थितीच अशी आहे की खाजगी practice चालतच नाही, मग कधी या हॉस्पिटलला तर कधी त्या, धावून धावून जीव दमून जातो. बर गेली ३० वर्षे practice करत आहेत, भरपूर पैसा गाठीशी आहे, म्हटले तर सर्व सुखे हात जोडून दाराशी उभी आहेत, तरी सुद्धा अजून धावपळ चालूच आहे. सकाळी ५ ते रात्री १२ असे रुटीन चालू आहे. का करतोय हे सगळे एवढा विचार करायला सुद्धा फुरसत नाही तिथे स्वच्छता अभियानाला काय डोंबल वेळ देणार हे? 

आमच्या ग्रुप मधला सर्वात तरुण म्हणजे साधारण ३५-४० वयोगटातला मित्र म्हणजे IT वाला. १८ वर्षे नोकरी करतो आहे, एव्हाना ५-६ कंपन्या बदलून झाल्या आहेत. वर्षातून किमान दोनदा तरी परदेश दौरे असतात. यांना आधीच लठ्ठ पगार, त्यात परदेश दौरा करून आले की आणखी कमाई. कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहेत. उच्चभ्रू वस्तीत ३-BHK घर आहे, दाराशी Honda latest model ची गाडी आहे, सुंदर संसार आहे. २ गोंडस मुले आहेत, शिवाय बायकोला पण चांगली नोकरी आहे. "हम दो हमारे दो" एवढेच यांचे जग आहे. महिन्यातून दोनदा गाडी काढायची आणि सुटायचे - कधी कोकणात तर कधी गोव्याला. तेवढाच जरा चेंज!  पण यांचा Work-Life Balance झीरो झालाय म्हणून सारखे रडत असतात. कामाच्या वेळा अतिशय odd झाल्यात, जायची वेळ सांगता येते पण परत यायची वेळ नाही; बर्याच वेळा तर घरीच काम घेऊन यावे लागते, week end ला सुद्धा घरून काम करावे लागते. तरी बरे हाताशी Smart Phone असल्याने सारखे फेसबुक, ट्विटर किंवा WhatsApp वरून नातेवाईक-मित्र यांच्या संपर्कात राहता येते नाहीतर अवघडच होते. संदीप खरे यांची "दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई" ही कविता यांच्यावरच लिहिली असावी अशी शंका येते. या अशा सदैव busy माणसांना कुठला आलाय देशासाठी वेळ? अहो ते परदेशी ग्राहकांसाठी काम करून डॉलर आणतात हीच केवढी मोठी देशभक्ती यांची! त्यांना तुम्ही स्वच्छता वगैरे करायला लावू नका बुवा. 

ते बघा, ते दिसतायत ना ते आहेत आमच्या येथील एका उच्च कॉलेजमधील तरुण-तरुणी. काय म्हणता शरीरयष्टीवरून शाळेतले वाटतात? अहो आजकाल शरीरयष्टी नाही तर Style बघायची असते. कित्ती मेहनत लागते Style develop करायला, Parlor मध्ये तासनतास बसावे लागते मनासारखी Hair Style किंवा Facial करून घ्यायला. अधून मधून सारखे मॉल मध्ये जाऊन Latest Fashion चा study करायला लागतो, नाहीतर ग्रुप मध्ये टिंगल होते ना. शिवाय आई-बाबांच्या मागे लागून latest smart phone आणि टू-व्हीलर पण घ्यावी लागते. Parents ना पटवायचे म्हणजे सर्वात difficult आहे. त्यांचे मूड्स बघायचे, ते किती बिझी आहेत याचा अंदाज घ्यायचा आणि बरोबर वेळ साधायची. हे म्हणजे काय Pizza खाण्याइतके सोपे काम आहे का? या सगळ्यातून वेळ झालाच तर कॉलेजला जायचे. एक वेळ तिकडे गेले नाही तरी चालते पण क्लास मात्र अटेंड करावाच लागतो, भरपूर पैसे भरले आहेत ना तिथे! तर या सगळ्या Up-to-date राहण्याच्या गडबडीतून या पोरांना देशाच्या स्वच्छतेसाठी वेळ कुठून मिळणार? अहो यांच्या आई-वडिलांनाच पोरांकडे लक्ष द्यायला वेळ नाही तिथे यांची काय कथा? 

तेव्हा मोदीजी, बघा बुवा, परत एकदा विचार करा तुमच्या महत्वाकांक्षी योजनेचा. आम्ही आपले तुम्हाला घर बसल्या Risks highlight करण्याचे मोठे काम केले आहे, ही सुद्धा एक प्रकारची देशभक्तीच नाही का? :-)

आपला घरबसू देशभक्त,
आ. ग. लावे

Saturday, 20 September 2014

वसुंधरेवरील तारे - डॉ. प्रभाकर चिंतामण जोशी

डॉ. प्रभाकर चिंतामण जोशी
डॉ. प्रभाकर चिंतामण जोशी
पुण्याजवळ अवघ्या ३५-४० कि.मी. वर असलेले भोर हे तालुक्याचे ठिकाण. भोरच्या बस स्थानकाच्या उजव्या बाजूच्या रस्त्याने बाजारपेठेतून भोरेश्वराच्या मंदिराकडे जाणारा रस्ता. मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्याआधी तुमचे मन शांत करावे व तुम्हाला प्रसन्न/पवित्र वाटावे म्हणूनच जणू काही परमेश्वराने त्याच रस्त्यावर मंदिराच्या थोडे आधी डॉ. प्रभाकर जोशी यांच्या घराची व्यवस्था केली असावी, असे मला कायम वाटत आले आहे.

डॉक्टरांच्या बैठ्या घरात शिरल्या शिरल्या प्रसन्न वाटावे असेच वातावरण. बैठकीची खोली, स्वयंपाकघर आणि शेजारच्या खोलीत दवाखाना अशी घराची मांडणी. सर्वत्र अत्यंत अकृत्रिम असा साधेपणा. बैठकीच्या खोलीतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले ३ सरसंघचालक - डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस - यांचे एकत्रित चित्र हे डॉक्टरांच्या निष्ठा आणि आदर्श दर्शविते. डॉक्टरांच्या डोक्यावरची पांढरी टोपी पाहिली की साने गुरुजींचाही प्रभाव त्यांच्यावर पडला आहे हे जाणवते. 

डॉक्टरांची, ती. सौ. काकूंची (पूर्वाश्रमीच्या विमल रानडे - त्याही स्वतः डॉक्टर, Gynaecologist) आणि त्यांचा मुलगा डॉ. उदय या सर्वांची गाठ पडली की आपल्याला जणू काही सात्विकतेचा नव्याने परिचय होतो. 

गेली ३० वर्षे डॉक्टरांची ओळख समस्त भोर तालुक्याला आहे ती त्यांनी १९८३ साली भोरपासून २० कि. मी. अंतरावर असलेल्या रावडी गावात सुरु केलेल्या आणि आजतागायत अतिशय नेटाने चालवलेल्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके शाळेमुळे.

डॉक्टरांचे जन्मगाव रावडी. रायरेश्वर जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती त्याच्या पायथ्याशी असलेले रावडी गाव. चहुबाजूनी भात शेतीने वेढलेले निसर्गसुंदर असे रावडी गाव. तिथे शिक्षणाची काहीच सोय नसल्याने डॉक्टरांना वाई, असवली इ. मोठ्या गावांमध्ये जाऊन शिक्षण घ्यायला लागले. त्यामुळे डॉक्टरांनी लहानपणापासूनच ठरवले की आपल्याला ज्या अडचणीतून शिक्षण घ्यायला लागले ती अडचण आपल्या गावातील आणि आसपासच्या मुलांना येऊ नये म्हणून आपण गावामध्ये शाळा काढायची.

वयाच्या सातव्या वर्षी डॉक्टरांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी ठरवले की आयुष्यात काही तरी केले पाहिजे. १० वी पर्यंतचे शिक्षण वाई, असवली येथे पूर्ण केल्यानंतर ११ वी / १२ वी चे शिक्षण पुण्यात स. प. महाविद्यालयात झाले. पुण्यात असताना घरोघरी दूध घालून अभ्यास केला. स. प. महाविद्यालयात शिकत असताना डॉ. दि. ब. केरूर यांचे अर्थशास्त्र आणि पु. ग. सहस्रबुद्धे सरांचे मराठी विषयात मार्गदर्शन मिळाले. पुण्याने डॉक्टरांना खूप काही दिले त्यामुळे आजही ते पुण्याचे ऋण मान्य करतात. १२ जुलै १९६१ ला ज्या दिवशी पुण्यात पूर आला होता त्या दिवशी डॉक्टर नेहमीप्रमाणे दूध घालत असताना अप्पा बळवंत चौकात अडकून पडले होते याची आठवण अजूनही ताजी आहे. नातुबागेमध्ये एक खोली घेऊन डॉक्टर राहायचे आणि स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करायचे. मुळात वाचनाची आवड असलेल्या डॉक्टरांना संशोधनपर आणि ऐतिहासिक लिखाण वाचायला आवडते.

नंतर वैद्यकीय शाखेत डॉक्टरांना प्रवेश मिळाला पण त्यासाठी पुणे सोडून अकोला इथे जायला लागले. डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी ही त्यांची प्रथमपासूनची इच्छा होती. त्याप्रमाणे अकोला येथे ५ वर्षे वैद्यकीय शिक्षण घेतले. या काळात त्यांना आपटे व वझे या संघ कार्यकर्त्यांची खूप मदत झाली. त्यांच्यामुळे संघाच्या कार्यालयात राहायची व आपटे यांच्या खानावळीत जेवणाची मोफत सोय झाली.

डॉक्टरांचा संघाशी संपर्क त्यांच्या काकांमुळे लहानपणापासूनच आला. पुढे शिक्षणाच्या दरम्यान डॉक्टर एक वर्ष विदर्भात मूर्तिजापूर इथे संघाचे प्रचारक म्हणून गेले होते. गेली अनेक वर्षांपासून डॉक्टरांकडे भोर तालुका संघचालक जबाबदारी आहे.

सुरुवातीची शाळा
१९७० च्या सुमारास वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर परत भोरला आले व इथे वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. त्याच सुमारास डॉक्टरांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी "सरस्वती प्रतिष्ठान" संस्था काढली. प्रत्यक्ष शाळा सुरु व्हायला १९८३ साल उजाडावे लागले. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १०० व्या पुण्यतिथीचे निमित्त साधून १७ फेब्रुवारी १९८३ रोजी चिखलगाव येथे २ शिक्षक आणि २० मुले यांना घेऊन शाळा सुरु झाली. १९८३ ते १९९३ ही १० वर्षे चिखलगाव येथील देवळामध्ये शाळा भरायची.

सुरुवातीचे दिवस अतिशय कठीण होते. विशेषतः आर्थिक बाजू. शाळेला शासकीय परवानगी तर मिळाली होती पण अनुदान मिळाले नव्हते. अशा परिस्थितीत जोशी कुटुंबियांनी स्वतःच्या खिशातील पैशातून शाळेतील शिक्षकांचे पगार व इतर खर्च भागवले. 
रावडी येथील जोशी परिवाराच्या जागेत शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
सुरुवातीच्या काळात उच्च शिक्षित असलेले श्री. रवि आचार्य सर, प्रभुदेसाई सर, नीलाताई पाठारे बाई, माधवराव देशपांडे सर असे अनेक निष्ठावान सहकारी डॉक्टरांना मिळाले. मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून हे शिक्षक मुलांबरोबर क्रिकेट खेळायचे व मग शाळा भरवायचे. २० विद्यार्थ्यांना घेऊन सुरु झालेली शाळा हळू हळू वाढू लागली. मग शाळेला जागा कमी पडायला लागली म्हणून जोशी कुटुंबियांनी रावडी येथील स्वतःची २ एकर जमीन शाळेला दिली. श्री. अरुण किर्लोस्करांनी शाळेला भरघोस मदत केल्याने रावडीला शाळेची इमारत १९९३ साली उभी राहिली.

सध्याची शाळा  
पण रायरेश्वराच्या पठारावरून ५-६ कि. मी. चालून शाळेला येणार्या विद्यार्थ्यांच्या अडचणी डॉक्टरांनी ओळखल्या व त्यांच्यासाठी वसतिगृह बांधायचे ठरवले. सातारा येथील एका संस्थेने दिलेल्या मदतीमुळे वसतिगृहाची इमारत २००० साली उभी राहिली. आज या वसतीगृहात ६० मुले विनामूल्य राहतात.

शाळेचे चांगले काम पाहून अनेक लोकांनी मदत केली. श्री. प्रकाश जावडेकर यांच्या आमदार निधीतून विज्ञान प्रयोगशाळा उभी राहिली. Cognizant Foundation ने केलेल्या मदतीमधून २००६-०७ पासून Computer Laboratory चालू झाली. शाळेत शिकलेल्या एका गरीब घरातील मुलाने वडिलांना मदत करून मिळालेल्या पैशातून शाळेला रु. १०,०००/- देणगी दिली.

आज रोजी शाळेत साधारण ४०० विद्यार्थी ५ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेत आहेत. पूर्ण वेळ शिक्षकांची संख्याही १७ आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब घरातील मुलांना शाळा अतिशय कमी पैशात शिक्षण देते.

गेल्या ३० वर्षात शाळेतील मुलांनी उल्लेखनीय यश मिळवलेले आहे. लीना ओव्हाळ ही मुलगी शाळेतून शिकून आता शासकीय सेवेत कलेक्टर पदावर काम करत आहे. २०१३ साली गणेश हासपे वर्धा येथील राष्ट्रभाषा प्रचार सभेने घेतलेल्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर सर्वप्रथम आला. अनेक विद्यार्थ्यांना राज्य सरकारची शिष्यवृत्ती मिळाली आहे. शाळेतील सर्व मुलांना भगवद्गीता म्हणता येते. या कारणास्तव २००६ साली गीता धर्म मंडळाने शाळेला आत्माराम करंडक दिला.

समाजाची सेवा करावी या भावनेबरोबरच समाजासाठी प्रचंड काम केलेल्या कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता भाव हा डॉक्टरांचा मोठा गुण आहे. या भावनेतूनच सुरुवातीला असलेले संस्थेचे "सरस्वती प्रतिष्ठान" हया नावाला "दधिचींना प्रणाम" हे नाव जोडले. दधिची ऋषींनी स्वतःच्या अस्थी देवांच्या चांगल्या कामासाठी दिल्या होत्या तसेच समाजातील आधुनिक दधिचींविषयी कृतज्ञता म्हणून "सरस्वती प्रतिष्ठान दधिचींना प्रणाम" असे थोडेसे मोठे व जरासे विचित्र नाव आग्रहपूर्वक संस्थेला दिले. नावात बदल करताना पुण्यातील धर्मादाय आयुक्तांनी आक्षेप घेतले; तेंव्हा दधिची कोण हे सर्व त्यांना समजावून सांगायला लागले.

मा. श्री. मोहनजी रानडे शाळेतील एका कार्यक्रमात 
याच कामाचा एक भाग म्हणून असंख्य कार्यकर्त्यांना डॉक्टरांनी मदतीचा हात दिला आहे. मग ते प्रमोद दीक्षित जे आसाममधे काम करताना दहशतवाद्यांकडून मारले गेले त्यांच्या नावाने शाळेत लावलेले झाड असो, किंवा गोवा मुक्ती संग्रामातील सेनानी श्री. मोहनजी रानडे यांचा शाळेत बोलावून केलेला सत्कार असो. १४ जानेवारी हा पानिपत युद्धाचा स्मरण दिवस. या दिवसाची आठवण राहावी म्हणून पेशव्यांची देवी ही मुरुड येथील दुर्गा देवी - तिला दर वर्षी १४ जानेवारीला अभिषेक चालू केला.


आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा अस्थिकलश एडनवरून शाळेत आणला 
वासुदेव बळवंत यांची आठवण म्हणून त्यांनी ज्या एडनच्या कारागृहात मरण यातना भोगून प्राण सोडले त्या ठिकाणची माती आणून तो कलश आज शाळेत ठेवला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना वासुदेव बळवंतांच्या त्यागाची जाणीव कायम राहावी. पुण्यातील CID विभागात जेंव्हा त्यांचा पुतळा बसवला होता त्या वेळेस त्या विभागाकडून शाळेला आवर्जून बोलावणे आले, त्याप्रमाणे शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्या कार्यक्रमात "गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार" हे गीत सादर केले.

भोर येथील वनवासी कल्याण आश्रमाचे काम डॉक्टरांच्या घरात सुरु झाले. आता आश्रमाची स्वतःची जागा आहे.

डॉक्टर स्वतः अतिशय कमी बोलतात आणि त्यांना जे म्हणायचे आहे ते कृतीतून दाखवतात. उ.दा. डॉक्टरांनी भोरेश्वर मंदिरात सनई वादनाची सुरुवात १९७९ साली केली. तेंव्हापासून भोर गावाची मंगल सुरुवात सकाळी ५:३० वाजता भोरेश्वराच्या सनई वादनाने होते. तशीच सनई डॉक्टरांनी रायरेश्वर आणि वाई येथे सुरु केली. आणि आता आंबेघर येथील प्राचीन शिवकालीन मंदिरात सनई सुरु करण्याचा मानस आहे.

शाळेच्या भावी योजनांमध्ये महाविद्यालय सुरु करायचे डॉक्टरांच्या मनात आहे; आवश्यक ती परवानगी मिळाली आहे. पुरेसे शिक्षक व विद्यार्थी मिळाले तर ते सुरु होईल. तरीही डॉक्टर व त्यांचे सर्व सहकारी धीर न सोडता काम करत आहेत.

तर असे हे आपले डॉक्टर जोशी, अतिशय निगर्वी, शांत आणि कृतज्ञ स्वभावाचे डॉक्टर. वैद्यकीय व्यवसाय करून प्रचंड पैसा मिळवण्याच्या सर्व संधी झुगारून देऊन स्वतःच्या गावात वैद्यकीय सेवा देतात, गावातील मुलांसाठी शाळा चालवतात, या सर्वांमधे त्यांच्या सुविद्य पत्नीची आणि मुलाची तितकीच तोलामोलाची साथ त्यांना लाभते. आणि तरीही प्रसिद्धीचे वारेही त्यांना शिवत नाही. कुठल्याही वर्तमानपत्रात, मासिकात किंवा दूरदर्शन माध्यमांमध्ये त्यांच्याबद्दल, त्यांच्या कामाबद्दल काहीही लिहून येत नाही. ही आपल्या माध्यमांमध्ये आणि विचारवंतांमध्ये असलेली वैचारिक अस्पृश्यातच दाखवते.

भोर गावामध्ये एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे उभे असलेले डॉक्टर, वयाच्या मर्यादेमुळे हालचालींवर मर्यादा आल्या तरी विचारांवर नाही आणि त्यातूनच नवनवीन योजना सहकार्यांच्या मदतीने राबवत असतात. त्यांचे उभे जीवन हे आपल्यासारख्यांसाठी एक आदर्शच आहे. आणि म्हणूनच ते आहेत या वसुंधरेवरील तारे. त्यांच्या पुढील कार्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊ या.

[संपर्कासाठी पत्ता - डॉ. प्रभाकर चिंतामण जोशी, मंगळवार पेठ, राजवाडा रस्ता, भोर ४१२ ०२६. दूरध्वनी क्र. +91 2113 222720, ई-मेल: joshibhor@yahoo.com]

Sunday, 13 July 2014

Don't Thank God, I am in minority!

Non-Disclaimer: The views expressed here are completely of my own. It is not intended to hurt any particular community. The word "I" used here represents not just myself but all those who follow all the good things that have been mentioned below. It is not at all obligatory for the readers to follow any of these.

It was a pleasant Sunday morning, the road just outside my house was mostly empty, an empty road is a rare phenomenon for a normal working day, but not for a Sunday. I was driving at usual speed when I came across a Red signal and as always I stopped waiting for it to turn Green. And then I saw few vehicles passing by me jumping the Red signal. They didn't care to look around nor they seemed to be bothered much. They were only interested in reaching their goal ahead of time; they would not have hesitated to drive the wrong way, honking unnecessarily and discomforting others who were following the discipline. I was a in a minority then.

But I prayed to the Almighty to bestow a lot of common sense in many of us that would inspire them to follow the traffic rules. And perhaps we will soon see अच्छे दिन for the Pune traffic.

Last year, during summer vacations, we were traveling to Mumbai by train. It was a Friday evening; the train was over-crowded, passengers were standing in a reserved bogie, the vendors were making round trips to sell their food items. Overall, it was a very noisy atmosphere. Soon we reached Lonavala and Vada-Paav vaalas barged into the bogie. The Vada-Paav was followed by Tea-Coffee vendors. After a nice round of snacks, many of the passengers kept the garbage under their seats; while few started throwing it outside the window. And these were so-called educated cultured citizens from the Metros.

Normally we carry our own bags to keep the garbage that we produce during the journey and throw it in the dustbins at the station. I wondered why these people could not do it. We started talking to few of them but to our disbelief we were greeted by bad words followed by a kind advice of minding our own business. Alas, we were in minority once again.

In 2012, I had to renew my passport and I was not getting time due to extremely hectic schedule at office. Many of the friends advised me to approach an Agent as it would have saved my time and frustration. All it would have taken is proper preparation for the passport appointment and reserving about 6-8 hours of time if planned in advance. Can't we do it ourselves?

Same scene goes for getting a Driving license, Ration Card, Railway bookings, etc. Why pay the Agents hefty amount almost double the original charges and encourage the Agent culture? But guess I am in minority again. :-(

Any businessman - be it a manufacturer, service provider, a building contractor, jeweller - have to pay bribes at the government office to get/renew licenses; as if this has become a norm. Examples of a successful clean businessman have become rare. Paying or taking bribes seems to be a socially accepted practice just as consuming liquor or going to a disco/dance bar.

Busy parents are attending every demand of their kids to keep them happy and warm; is it a give-and-take for the time that they cannot spend with the kids? Those who don't do it often are succumbed to the peer pressure. Are we creating a healthy future for our children when we encourage them to eat junk food regularly, celebrate birthdays in restaurants or gifting them expensive things for their age?

I again find myself in minority, but this time I thank God because my conscience tells me that it is better to be with my children - playing games, going to parks, occasionally eating outside, going on a vacation with them - than to succumb to their unreasonable demands. We just need to be little bit strict and firm with ourselves.

So, are you in a minority and feeling proud about it? Or are you succumbing to the current social norms and be happy that you are not the only ones? Ask and decide yourself!

Being in minority on the above matters won't draw any benefits for you from Government schemes; however you would certainly be more satisfied and happy with yourself that you are on the right path to secure an environment friendly, value-based happy future for the generations to come.

Perhaps you will be awarded with lots of मनःशांती which will be with you forever, choice is yours.