Friday 6 December 2019

अनमोल रतन (Precious Jewels) - 6 : Twin Magic by Pandit Ravishankar


Image Courtesy: time.com
Friends,

I am extremely happy to present the sixth song of the series Anmol Ratan. This time it is what I call the Twin Magic by none other than the great musician of yesteryear late Pandit Ravishankar. 11th December is his Death anniversary, hence thought it would be more appropriate to remember him on this day through his great compositions.

English version of the blog is at the end of the Marathi version below

Song #6: Kaise din beete kaise beetin ratiyaan
Song #7: Haaye re woh din kyon na aaye


Film         : Anuradha (1960)
Director   : Hrishikesh Mukherjee
Cast         : Balraj Sahni, Leela Naidu, Abhi Bhattacharya, 
                  Naseer Hussain 

Lyrics       : Shailendra

Composer : Pandit Ravishankar 

Singer       : Lata Mangeshkar


आपल्या हिंदी चित्रपट संगीताला संगीतकारांची एक वैभवशाली परंपरा आहे. १९३२ मध्ये आलेल्या पहिल्या "आलम आरा" या बोलपटाला संगीत दिलेली संगीतकार जोडी फिरोजशाह मिस्त्री आणि बी. इराणी, नंतर आलेले गोविंदराव टेंबे, आर. सी. बोराल, पंकज मलिक, अनिल विश्वास यांच्यापासून ते अगदी अलीकडच्या रहमान यांच्यापर्यंत हिंदी चित्रपट संगीतकारांची एक मोठी यादीच तयार होईल.

पण मूलतः शास्त्रीय संगीत प्रांतातील असलेले पण हिंदी चित्रपटांना संगीत दिलेले असे मात्र मोजकेच सापडतील उ. दा. उस्ताद अली अकबर खान (सतार), पन्नालाल घोष (बासरी), शिव-हरी (पं. शिवकुमार शर्मा (संतूर) आणि पं. हरिप्रसाद चौरासिया (बासरी)), उस्ताद झाकीर हुसेन (तबला). या मान्यवरांच्या यादीत एक महत्वाचे नाव म्हणजे प्रख्यात सतारवादक पंडित रविशंकर! 

पं. रविशंकर यांनी मोजक्याच बंगाली, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांना संगीत दिले. त्यातले "पाथेर पांचाली", The World of Apu, Parash Pathar, "अपराजितो", Gandhi हे बंगाली आणि इंग्रजी चित्रपट तर "धरती के लाल", "अनुराधा", "मीरा", "नीचा नगर" आणि "काबुलीवाला" हे हिंदी चित्रपट त्यातील संगीताने खूप गाजले.



पण हिंदी चित्रसृष्टीला रविशंकर यांची संगीतकार म्हणून दखल घ्यावी लागली ते "अनुराधा" या १९६० साली आलेल्या हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित चित्रपटातील संगीताने. या चित्रपटात रविशंकरांनी त्यांच्या सतारीवरील प्रभुत्वाचा पुरेपूर उपयोग करून घेतला. त्याचबरोबर व्हायोलिन, बासरी आणि सारंगी यांच्या मधुर स्वरांचे नियोजन प्रत्येक गाण्यामध्ये अचूक ठिकाणी करून त्या गाण्याची मधुरता कैक पटीने वाढवली.



Leela Naidu
Photo courtesy thedailystar.net
बलराज साहनी आणि लीला नायडू (मधुबालानंतरचा त्या काळातील पडद्यावरचा सर्वात सुंदर चेहरा - हे आपले माझे मत बरं का!) यांच्या अप्रतिम अभिनयाने या चित्रपटाने एक वेगळीच उंची गाठली. 

चित्रपटाची सुरुवातच मुळी "सांवरे सांवरे" या गाण्याने होते. या शिवाय "जाने कैसे सपनों में खो गयी आखियां", "कैसे दिन बीते", "समा अलबेला दिन है मिलन के", " सुन मेरे लाल" आणि "हाए रे वो दिन क्यों न आये" अशी एकाहून एक सुंदर गाणी या चित्रपटात आहेत.

लताची Top 10 गाणी निवडायची झाली तर त्यात मी "कैसे दिन बीते" आणि "हाए रे वो दिन क्यों न आये" या २ गाण्यांचा समावेश नक्की करेन.


"अनुराधा" ही एका स्त्रीची गोष्ट आहे. अनुराधा राय (लीला नायडू) ही श्रीमंत बापाची मुलगी स्वतः एक उत्तम गायिका आणि नर्तिका असते. रेडिओवर तिचे गाण्याचे कार्यक्रम होत असतात. संगीत तिचा श्वास असतो. योगायोगाने तिची गाठ डॉ. निर्मल चौधरी (बलराज साहनी) या आदर्शवादी डॉक्टरशी पडते. दोघे प्रेमात पडतात व कालांतराने लग्न करायचे ठरवतात. डॉ. निर्मलने अनुराधाला त्याच्या खडतर व्यवसायाची कल्पना दिलेली असते. या दरम्यान अनुराधाचे वडील तिचे लग्न लंडनहून नुकत्याच परतलेल्या दीपकशी (अभि भट्टाचार्य) करायचे योजत असतात. पण अनुराधा वडिलांना न जुमानता डॉ. निर्मलशी लग्न करते. दोघांना एक मुलगीही - राणू - होते. त्यानंतर अनुराधा संसार आणि मुलीचे संगोपन यात स्वतःला इतकी झोकून देते की स्वतःच्या आवडीनिवडीही बाजूला ठेवते. ती एकेकाळी गायिका असते हे सुद्धा ती विसरते. दुसरीकडे डॉ. निर्मल दिवसरात्र गरिबांची सेवा करण्यात मश्गुल राहतो, त्याला कामापुढे बायको, संसार, मुलगी काही दिसत नाही. परिणामतः अनुराधाचे जीवन खूप एकाकी होते.


पुढे अपघातानेच एक दिवस दीपक हा डॉ. निर्मलचा रुग्ण म्हणून अनुराधाच्या घरी येतो. त्याला अनुराधाची मनःस्थिती कळून येते. तो अनुराधाला तिच्यात दडलेल्या गायिकेची आठवण करून देतो. तिला एखादे तरी गाणे म्हणून दाखवण्याची विनंती करतो. अनुराधा तिच्या मनाची व्यथा गाण्यातून मांडते आणि मग सुरु होते एक अप्रतिम गाणे - कैसे दिन बीते!  

रविशंकरांनी यांनी जयजयवंती रागात बांधलेल्या या गाण्यात कमाल केली आहे. गाण्याची सुरुवातच मुळी "हाए" शब्दावरील लताने घेतलेल्या सुंदर कोमल मुरकीने होते. त्यानंतर 00:002 पासून ते 00:16 पर्यंत व्हायोलिनच्या तुकड्यातून दीपक - जो अनुराधाचे गाणे अनेक वर्षांनंतर ऐकण्यात उत्सुक असतो - त्याची उत्सुकता काय छान दाखवली आहे पहा. सुरुवातीच्या दोन "हाए" मध्ये वाजणारी सारंगी व नंतर आलेला छोटासा बासरीचा तुकडा अनुराधाची वेदना प्रकट करतात. आणि नंतर मग संपूर्ण गाण्यातून प्रतीत होते ती फक्त एका विवाहितेची अगतिकता. मुखडा आणि प्रत्येक अंतऱ्याच्या शेवटी "पिया जाने ना" लताने जसं म्हटलंय त्याला तोड नाही, लताच्या स्वरातील व्याकुळता अनुराधेची वेदना अधिकच ठळकपणे दाखवते. शैलेंद्र यांनी हे गीत असं काही लिहिलंय की जणू तेच अनुराधाचे जीवन स्वतः जगलेत! 

संपूर्ण चित्रपटात आणि या गाण्यात सुद्धा दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांची हातोटी जागोजागी दिसते. विशेषतः कॅमेऱ्याचे अँगल्स आणि Light Effects ज्या तऱ्हेने या गाण्यात दिसतात ते केवळ लाजवाब! 
उ. दा. अनुराधा आणि डॉ. निर्मल किंवा दीपक यांचे गाण्यातील एकाच फ्रेम मधले दृश्य, डॉ. निर्मल त्याच्या अभ्यासात  नेहमीप्रमाणे गढून गेलाय, आणि अनुराधा हताशपणे त्याकडे बघते आहे.
दुसऱ्या कडव्याच्या सुरुवातीला "रुत मतवाली आ के चली जाये" ही ओळ गाताना अनुराधाचे प्रतिबिंब तिच्याच तरुणपणाच्या फोटोसमोर दाखवले आहे; जणू काही तरुणपणाची स्वप्ने बघता बघता हातातून निसटून गेली हे दर्शविण्यासाठी. १९६० च्या दशकात चित्रपटांचे तंत्रज्ञान फार पुढारलेले नसतानाही असे दृश्य निर्माण करण्याचे कसाब त्या संकलकाचे.  

शेवटच्या कडव्यात "बरखा ना भाए, बदरा ना सोहे" या ओळीतील "सोहे" वर लताने जो अप्रतिम तार स्वर लावला आहे त्याला तोड नाही. गाण्याचा शेवटही वेगळ्याच पद्धतीने गायलेल्या "पिया जाने ना" ने होतो.

शैलेंद्र यांचे शब्द, लीला नायडू, बलराज साहनी आणि अभि भट्टाचार्य यांचा अभिनय, रविशंकरांचे अप्रतिम संगीत आणि या सर्वांना न्याय देणारा लताचा आवाज, सर्वच अनुभवण्यासारखे. अवश्य ऐका आणि आनंद घ्या!


अनुराधाच्या मनातील व्यथा "कैसे दिन बीते" या गीतातून तिच्याच तोंडून ऐकल्यानंतर दीपकला अनुराधाच्या परिस्थितीची जाणीव होते आणि तिने स्वतःमधील गाणे मारले आहे हे त्याला कळून चुकते. त्याला खूप वाईट वाटते. तो तिला परत गाणे सुरु करण्याचा सल्ला देतो, पण अनुराधा ऐकत नाही. "जागे हुए को होश में लाना आसान नहीं" हे कळल्यावर दीपक अनुराधाचे घर सोडायचे ठरवतो. या दरम्यान अनुराधा-डॉ. निर्मल यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. अनुराधा निर्मलला त्याची आठवण करून देते, तो तिला रात्री ८ वाजता येऊन वाढदिवस साजरा करण्याचे आश्वासन देतो. आनंदलेली अनुराधा रात्रभर डॉ. निर्मलची वाट बघते, पण निर्मल एका रुग्णाच्या सेवेत अडकल्यामुळे येऊ शकत नाही. तो सकाळी उशिराने घरी परततो, तोपर्यंत अनुराधा संतापलेली असते. तिच्या संयमाची, डॉ. निर्मल कधीतरी तिच्याकडे लक्ष द्यायला लागेल या आशेची परिसीमा झालेली असते. अनुराधा आता मात्र डॉ. निर्मलचे घर सोडून वडिलांकडे परत जायचा निर्णय घेते व डॉ. निर्मलला तो निर्णय सांगते. अर्थात, निर्मल दुःखी होतो पण तो काही करू शकत नसतो. 


दरम्यान शहरातून एक प्रसिद्ध डॉक्टर कर्नल त्रिवेदी आणि त्यांचे मित्र हिरालाल वर्मा हे डॉ. निर्मलला भेटतात व त्याच दिवशी संध्याकाळी निर्मलच्या घरी जेवायचा कार्यक्रम ठरवतात. त्यामुळे निर्मल अनुराधाला १ दिवस थांबून दुसरे दिवशी जायची विनंती करतो. संध्याकाळी कर्नल त्रिवेदी जेवायला डॉ. निर्मलाच्या घरी येतात. आल्याआल्याचं त्यांना अनुराधाचा तरुणपणाचा फोटो व तिने मिळवलेली बक्षिसे दिसतात.  टेबलावर ठेवलेल्या रुद्रवीणेवर आणि पुस्तकांवर साठलेली धूळ दिसते. आणि त्यांना सर्व गोष्टींचे आकलन होते. डॉ. निर्मल अनुराधाची ओळख करून देतो. कर्नल त्रिवेदी तिला गाणे गायची विनंती करतात. मग सुरु होते आणखी एक अप्रतिम गीत "हाए रे वो दिन क्यों न आये"


या गाण्यातही कॅमेऱ्याचे अँगल्स, प्रकाश योजना यावर दिग्दर्शकाची छाप दिसते. हे गीत रविशंकरांनी राग जनसंमोहिनी मध्ये बांधलेलं आहे. व्हायोलीन, बासरी, सतार आणि सारंगी यांनी गाणं सजवलं आहे. लताचे आवाजावरचे कमालीचे नियंत्रण आणि ते राखतानाच अनुराधाच्या वेदना आवाजातून समर्थपणे व्यक्त करणे हा या गाण्याचा प्लस पॉईंट आहे. "जा जा के रितू लौट आए" ही ओळ ऐकताना या दोन्ही गोष्टी ठळकपणे जाणवतात. याच ओळींनंतर येणारा बासरीचा तुकडा तर केवळ लाजवाब! प्रत्येक वेळी ही ओळ ऐकताना आपण एक प्रेक्षक म्हणून अनुराधाच्या भावनांशी तादात्म होऊन जातो आणि टचकन डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही. "झिलमिल वो तारे कहाँ गये सारे" किंवा "सूनी मेरी बीना संगीत बिना" या दोन्ही ओळींच्या उत्कर्षबिंदूवर लताने जो काळीज पिळवटून टाकणारा स्वर लावला आहे त्याने आपण अचंभित होऊन जातो! संपूर्ण गाण्यात डॉ. निर्मल उद्या अनुराधा सोडून जाणार म्हणून अतिशय काळजीत दिसतात, बलराज साहनी यांनी आपल्या संयमित अभिनयाने ही व्यक्तिरेखा अतिशय ताकदीने उभी केली आहे. 



गाणे संपले तरी आपल्यावर त्याचा ठसा बराच काळ राहतो यातच या गाण्याचे यश सामावलेले आहे. असा हा अप्रतिम संगीत, अभिनय, दिग्दर्शन आणि गायकीने नटलेला "अनुराधा". एकदा तरी अवश्य वेळ काढून बघा आणि ही कलाकृती निर्माण करणाऱ्यांना धन्यवाद द्या, एवढे कराच, मित्रांनो!

=============================================================================
"Anuradha" is a 1960 film of a young woman Anuradha (Leela Naidu) who gets married to an idealistic Dr. Nirmal Chaudhari (Balraj Sahani) who has pledged to serve the poor. Anuradha's father had decided to get her married to a London-returned young boy - Deepak (Abhi Bhattacharya); however Anuradha - deeply in love with Dr. Nirmal - rejects her father's proposal, runs away and gets married with Dr. Nirmal.

Both Dr. Nirmal and Anuradha have a lovely daughter - Renu. However, Anuradha finds Dr. Nirmal always caring more for his patients and does not pay any attention to his family. As years pass by, Anuradha starts feeling more and more lonely. She had sacrificed her singing and other hobbies. After she once again meets Deepak accidentally. he tries to pursue Anuradha to start singing again and not neglect her singing talent. He requests her to sing a song, Anuradha obliges by singing "Kaise Din Beete" - a wonderful composition in Jayjaywanti raag by Pt. Ravishankar. Shailendra's poetry perfectly portray Anuradha's feelings. Use of Flute, Sitar, Violin and Sarangi play an important role in enhancing the sweetness of the song. Lata's voice is at its best, only to be experienced. 

Hrishikesh Mukherjee as the Director of the movie has used camera angles and light effects extremely intelligently to capture the agony of Anuradha. The magic of cameraman and editor is at the fore during the rendition of line "Rut matwali aa ke chali jaaye" when Anuradha's past and present photographs are shown in one frame to depict the lost opportunity for Anuradha. 

As the movie progresses, we see Anuradha feeling frustrated with the situation and her helplessness. And when Dr. Nirmal does not return home to celebrate their wedding anniversary, after promising Anuradha, she gets extremely angry and decides to leave the house forever and go back to her father's place to restart her singing career. Colonel Trivedi - a well known Doctor from the city - and his friend visit their house on one evening for the dinner. When Colonel Trivedi sees young Anuradha's photograph with trophies and then goes on to see the Rudraveena and books not being used for years, he realises Anuradha's plight. He requests Anuradha to sing a song for him and there starts another gem of a song "Haaye re woh din kyon naa aaye". This song has been composed in Raag Janasammohini and like the earlier song, has excellent use of Sarangi, Flute and Sitar. Lata's voice control in "Jaa jaa ke ritu laut aaye" and amazing rendition of "Zilmil woh taare kahan gaye saare" or "Suni meri beena sangeet bina" in high pitch is simply awesome and is perhaps the USP of the song! 


Lata Mangeshkar - Pandit Ravishankar
This song has a long lasting impact even after it is over. Hats off to the entire team for giving us such gem of songs in one movie. Unfortunately, Pt. Ravishankar and Lata did not work much together and the audience perhaps lost what would have been a heavenly music.



For English readers, here are the two links, which will give you a very thorough review of the film.

https://anuradhawarrier.blogspot.com/2017/10/anuradha-1960.html
https://madhulikaliddle.com/2009/09/05/anuradha-1960/

For now, enjoy the songs - videos embedded in the Marathi version above. Hope you would like it. Do post your comments.

Thank you!

Wednesday 7 August 2019

अनमोल रतन (Precious Jewels) - 5 : A Bengali song by Lata Mangeshkar

Friends,

I am really happy to present the fifth song of the series Anmol Ratan and this time it is a Bengali jewel from Lata Mangeshkar!

English version of the blog is at the end of the Marathi version below

Song #5: Aar jeno nei kono bhabna (আর যেন নেই কোন ভাবনা)


Film       : Deep Jele jai (1959)
Director : Asit Sen
Cast      : Suchitra Sen, Basanta Chowdhury, Pahari Sanyal, Anil Chatterjee, Tulsi Chakraborty, Kajari Guha, Namita Sinha 
Lyrics       : Gauriprasanna Mujumder
Composer : Hemanta Mukhopadhyay aka Hemant Kumar 
Singer       : Lata Mangeshkar


Gauriprasanna Mujumder

Hemant Kumar




असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीला काळ आणि वेळेचा योग यायला लागतो. माझ्या आयुष्यात जुनी बंगाली गाणी ही अशीच काही वर्षांपूर्वी अचानक आली. साधारण २०१६-१७ मध्ये माझा मित्र अद्वैत धर्माधिकारी याने स्वामी विवेकानंद आणि संगीत या विषयावर एक व्याख्यान पुण्यात सुदर्शन रंगमंच येथे दिले होते. वेगळा विषय असल्याने मी उत्सुकतेने त्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे अद्वैतने विवेकानंद जे भजन त्यांच्या गुरूंसाठी म्हणजे रामकृष्णांसाठी म्हणायचे ते "Shyma maa ki amaar" हे भजन पन्नालाल भट्टाचार्य यांच्या आवाजात ऐकवले. रंगमंचातील डॉल्बी सिस्टिम मुळे ते भजन खूपच प्रभाव टाकून गेले, इतका की नंतर बरेच दिवस मी ते भजन रोज ऐकत होतो. नंतर काही महिन्यांनी Whatsapp वर काही मित्रांनी प्रसिद्ध हिंदी गाण्यांची मूळ बंगाली गाणी पाठवली. ती पण आवडली होते. मात्र काही महिन्यांपूर्वी एक दिवस अचानक जुनी बंगाली गाणी Internet वर सापडली. लता, गीता दत्त, आशा, हेमंत कुमार, किशोर कुमार यांची बंगाली गाणी ऐकून मी अक्षरशः झपाटला गेलो. गेले काही महिने मी ही झपाटलेली अवस्था अनुभवतोय. रोजचा दिवस लताची बंगाली गाणी ऐकल्याशिवाय सुरु होत नाही आणि मावळतही नाही. अपार आनंद दिलाय या गाण्यांनी. लताजींचा इतका गोड आवाज मी मराठी आणि हिंदीत क्वचितच ऐकला असेल असे थोडे धाडस करून मी म्हणू इच्छितो.

हे गाणे आहे १९५९ साली प्रदर्शित झालेल्या "दीप जेले जाय" या चित्रपटातले. दिग्दर्शक असित सेन यांनी पुढे १९६९ साली हाच चित्रपट हिंदीत "खामोशी" या नावाने आणला होता. दोन्ही चित्रपटांना अप्रतिम संगीत स्व. हेमंत कुमार यांनी दिले आहे. हेमंत कुमारांनी एकूण १३८ बंगाली चित्रपटांना संगीत दिले आहे, त्याशिवाय रवींद्र संगीतातील त्यांची गाणी संपूर्ण बंगाल मध्ये गाजली आहेत आणि आजही गायली जातात. त्यांच्या बंगाली चित्रपटातील कामाची आणि योगदानाची तुलना आपले बाबुजी म्हणजेच सुधीर फडक्यांच्या मराठीतील योगदानाशीच होऊ शकते. लताजींनी बंगालीत एकूण १८५ गाणी गायली आहेत. हेमंत कुमार, सलील चौधरी, भूपेन हजारिका, व्दिजेन मुखर्जी, शैलेंद्र चौधरी इ. संगीतकारांच्या रचनांना चार चाँद लावण्याचे काम लताजींनी केले आहे.

ज्यांनी "खामोशी" हा चित्रपट पाहिला नसेल त्यांच्यासाठी "दीप जेले जाय" चित्रपटाची कथा थोडक्यात:

हा चित्रपट आशुतोष मुखर्जी यांच्या "नर्स मित्रा" या लघुकथेवर बेतलेला आहे. लंडनहून शिकून आलेली राधा मित्रा (सुचित्रा सेन) कोलकत्यातील एका वेड्यांच्या इस्पितळात नर्स म्हणून काम करत असते. मानसिक रुग्णांची मैत्रीण आणि प्रेमिका असल्याचा अभिनय करून रुग्णांना त्यांच्या मानसिक अवस्थेतून बरे करण्याची जबाबदारी राधावर सोपवलेली असते. तिचा पहिला पेशंट देबाशिष याला बरे करता करता राधा त्याच्या प्रेमात पडते, पण तो बरा झाल्यावर आपल्या मैत्रिणीशी लग्न करून नवीन आयुष्याला सुरुवात करतो. या धक्यातून राधा सावरते ना सावरते तोच इस्पितळातील प्रमुख डॉक्टर (पहाडी संन्याल) तिला आणखीन एका पेशंटची - तपसची (बसंत चौधरी) - केस देतात. नाईलाजाने राधा तपसवर उपचार करण्याचे कबूल करते. तपसच्या सुलेखा (काजोरी गुहा) नावाच्या मैत्रिणीमुळे तो मनोरुग्ण झालेला असतो, हे राधाला कळल्यावर ती सुलेखाला भेटायला जाते. राधा जेंव्हा सुलेखाच्या घरी पोचते त्यावेळी ती पियानोवर खालील गाणे म्हणत असते.

पुढे तपसवर उपचार करता करता राधा पुन्हा एकदा प्रेमात पडते. तपस पण बरा होतो; पण आता वेडे होण्याची पाळी राधाची असते. चित्रपटाच्या शेवटी राधा स्वतःच एक मनोरुग्ण म्हणून इस्पितळात दाखल होते. चित्रपटाचे अतिशय सविस्तर आणि सुंदर विश्लेषण खालील लिंकवर वाचायला मिळेल
https://learningandcreativity.com/silhouette/revisiting-deep-jele-jai/

सुचित्रा सेनने आपल्या अप्रतिम सौंदर्य व अभिनयाने हा चित्रपट खाऊन टाकला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या चित्रपटात एकूण ३ गाणी आहेत - मन्ना डे यांनी गायलेले "Aeimon bondhu aar ki", हेमंत कुमारांचे प्रचंड गाजलेले "Ei raat amaar tomaar" हे गाणे (जे हिंदी मध्ये "ये नयन डरे डरे" म्हणून आले) आणि लताजींनी गायलेले "Aar jeno nei kono bhabna". 

गाण्याची सुरुवात पियानोने होते आणि मग येतात लताचे स्वर्गीय स्वर, पार्श्वभूमीवर वाजते ती अप्रतिम बासरी. संपूर्ण गाण्यात पियानो आणि बासरी यांची जणू जुगलबंदीच आहे. विशेषतः पहिल्या ओळीच्या शेवटी येणाऱ्या "भाबोना", तसेच पहिल्या कडव्याच्या पहिल्या ओळीच्या शेवटी येणाऱ्या "तुलबे" या शब्दांच्या मागून ऐकू येणारी सुमधुर बासरी. दोन कडव्यांच्या मध्ये वाजणारा पियानो तुम्हाला इतका गोड क्वचितच ऐकू आला असेल. हे कमी की काय म्हणून अंतरा आणि दोन्ही कडवी संपतानाच्या "पाबोना" या शब्दावर लताजींनी घेतलेली जीवघेणी हरकत, अहाहा!

या गाण्याच्या सौंदर्याचा सर्वोच्च बिंदू कुठला असेल तर तो म्हणजे पहिले कडवे संपल्यावर लगेचच म्हटलेल्या २ ओळी "जानी ना.." पासून ते "दिये जाय जे उडे" इथपर्यंत. इथे गाण्याची चाल आणि ताल दोन्ही बदलतात पण तरीही कानाला कुठेही खटकत नाही. या दोन ओळी आपल्याला काही सेकंदांपुरत्या वेगळ्या विश्वात घेऊन जातात आणि परत मूळ चालीवर दुसऱ्या कडव्यापाशी आणून सोडतात. सारेच कानात साठवून घेण्यासारखे.

लताजींचे निर्दोष बंगाली उच्चार हे एखाद्या अ-बंगाली माणसाकरता किती अवघड आहे हे आपण स्वतः जेंव्हा हे गाणे म्हणायचा प्रयत्न करू तेंव्हा लक्षात येते. त्याबद्दल त्यांना सलाम!

गाण्याचे शब्द आणि इंग्रजीतील अर्थ खाली दिला आहे. तसेच लताजींच्या आणखी काही गोड बंगाली गाण्यांच्या लिंक्स लेखाच्या शेवटी दिल्या आहेत. ती गाणीही जरूर ऐकावीत.

या गाण्याने मला जितका आनंद दिला तितकाच तो आपल्यालाही होईल अशी आशा आहे. भाषेचा अडसर बाजूला सारून फक्त संगीत आणि स्वर यासाठी हे गाणे जरूर ऐका, कदाचित २-४ वेळा ऐकल्यावर आवडायला लागेल. आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.

Video link
https://www.youtube.com/watch?v=WNtZQmIM2lY



Lyrics:  (English translation courtesy - Gargi Bhattacharya)

Aar jeno nei kono bhabona
Jodi aj okaron kothao haray mon
Jani ami khuje tare ar pabona

(There are no worries. If my mind gets lost today for no reason, I know I would not get it back)


Bhromorer benu sur tulbe sei sure mon amar bhulbe
Kohibe fagun jeno amare
Ami tomar bhubon chere kobhu jabona

(Bee's flute will play a tune and my mind will dive in that tune. The sprint will probably tell me I will never leave your world)


Janina se to ami janina
Ogo kon sudure amake bolakara daak diye jay je dure

(I don't actually know, but geese call me from very far away to unknown destination)


Koto kotha prane jeno jaglo apnare koto bhalo laglo
Akhite swapan ache jorano
Ami ei abesh kobhu fele jete chabo na


(Many thoughts arose in my heart - I felt beautiful from inside. My eyes are wrapped in a dream. I never want to come out of this euphoria)

আর যেন নেই কোন ভাবনা
যদি আজ অকারন কোথাও হারায় মন
জানি আমি খুঁজে তারে আর পাবনা

ভ্রমরের বেনু সুর তুলবে সেই সুরে মন আমার ভুলবে
কহিবে ফাগুন যেন আমারে
আমি তোমার ভুবন ছেড়ে কভু যাবনা

জানিনা সে তো আমি জানিনা
ওগো কোন সুদূরে আমাকে বলাকারা ডাক দিয়ে যায় যে দূরে

কত কথা প্রানে যেন জাগলো আপনারে কত ভালো লাগলো
আঁখিতে স্বপন আছে জড়ানো
আমি এ আবেশ কভু ফেলে যেতে চাবো না





Friends,

I am extremely happy to present to you this Bengali jewel from Lata Mangeshkar. It's from the 1959 film 'Deep Jele Jai' directed by Asit Sen who remade the film in Hindi by the name 'Khamoshi' in 1969.

Suchitra Sen plays the main lead of a nurse Radha Mitra working in a Mental Hospital at Kolkata. Her job is to play the role of a friend and lover for the mentally ill patients, without getting emotionally involved in them. However, she falls in love with her first patient - Debashish - while curing him by enacting as his friend and lover. After he is cured, he goes home and starts a new life with his girlfriend. Learning this, Radha is shocked; however recovers and starts working again. The circumstances force her to take up the second case that of Tapas (Basanta Chowdhury) who is in deep depression due to his girlfriend - Sulekha (Kajari Guha). Radha tries to meet Sulekha and asks for her help to get Tapas out of the trauma. We see Sulekha singing this song on the Piano when Radha visits her home.

In the end, Radha could not help herself from falling in love with Tapas; and when he too leaves the hospital, Radha is shattered. As a result, she gets admitted into the same hospital as a patient herself.

The film was a hit in Bengal and the song 'Ei raat tumaar amaar' by Hemantda is termed as the Signature song of the film, and is a huge hit even today. This song was remade in Hindi as 'Yeh nayan dare dare'.

Excellent and very detailed analysis of the film can be found at
https://learningandcreativity.com/silhouette/revisiting-deep-jele-jai/

The song that is presented here 'Aar jeno nei kono bhabna' is one of the best melodies I have ever heard from Lata. I cannot recall any sweeter voice of hers even in Marathi and Hindi. Being a Maharashtrian myself, I can imagine how difficult it would have been for Lataji to get the Bengali pronunciation perfect and still deliver the song with all its melody, hats off to her.

The composition is simply amazing specially the use of Piano and Flute. Lata's tonal quality and voice control are of high calibre as always. Please listen carefully the flute in the background of the words "Bhabna" or "Tulbe". The high point of the song are the 2 lines rendered just after the first Astaai (1st stanza).

Hope you will like the song. Please do share your feedback. Thanks.


MUST LISTEN Bengali Songs:

1) Akash Prodip Jole - Salil Chaudhary - Lata
2) Asharh Sraban Maney na to Mon - Monihar (1966) - Hemant Kumar - Lata
3) Nijhumo Shondhay Pantho Pakhira - Monihar (1966) - Hemant Kumar - Lata
4) Chanchal Mayuri e raat bodhu jete - Adwitiya (1968) - Hemant Kumar - Lata
5) Rangila Bashite ke daake - Bhupen Hazarika - Lata
6) Tumi Je Amaar - Harano Sur (1957) - Hemant Kumar - Geeta Dutt (what a song - gem!!)

7) Nishiraat Baka Chaand Akashe - Prithibi Amare Chai (1957) - Nachiketa Ghosh - Geeta Dutt


Enjoy the music, have a great life. Thanks.

Friday 15 February 2019

पुलवामा : क्रियाशील अतिरेकी, निष्क्रिय समाज!!

पुलवामा : क्रियाशील अतिरेकी, निष्क्रिय समाज!!



काल १४  फेब्रुवारी २०१९ रोजी जेंव्हा भारतीय तरुणाई व्हॅलेंटाईन दिवसाच्या निमित्ताने बेभान होऊन आकंठ प्रेमात बुडून गेली होती, नोकरदार आणि व्यावसायिक जेंव्हा आपापल्या उद्योगात मग्न होते, गृहिणी जेंव्हा घरकामात व्यस्त होत्या, ज्येष्ठ नागरिक जेंव्हा दुपारची विश्रांती घेत होते, बहुसंख्य भारतीय जेंव्हा Whatsapp, Facebook, Twitter, Instagram इ. माध्यमांवर पडीक होते, बिनकामी आळशी लोक जेंव्हा कट्ट्यावर बसून मोठमोठ्या गप्पा मारत होते, पत्रकार आणि माध्यमकर्मी जेंव्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या खमंग चर्चा घडवून आणायचे बेत आखत होते, विद्यार्थीवर्ग जेंव्हा आपापल्या शाळा/कॉलेज मध्ये शिकत होता, तेंव्हा दुपारी ३:३० च्या सुमारास काश्मीर खोऱ्यातील पुलवामा इथे जैश-ए-मोहम्मद च्या अतिरेक्याने भ्याड आत्मघाती हल्ला करून ४० पेक्षा आधी CRPF च्या जवानांना ठार मारले.

हे तेच जवान होते जे आपली सुट्टी संपवून पुन्हा कामावर रुजू व्हायला चालले होते, हे तेच जवान होते जे डोळ्यात तेल घालून दिवस-रात्र कडाक्याची थंडी, कडक ऊन, अथवा तुफान पाऊस वा बर्फवृष्टी कशाची तमा न बाळगता आपल्या सीमांचे आणि पर्यायाने आपले रक्षण करतात. तुम्ही कधी काश्मीर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या सीमावर्ती प्रांतात गेलात तर "उनसे कहो की आपके कल के लिये हमने अपना आज कुर्बान कर दिया" अशा पाट्या दिसतील. अर्थात हा संदेश तुमच्यात काही संवेदनशीलता शिल्लक असेल तरच तुम्हाला भिडेल अन्यथा तुम्ही आजपर्यंत आहात तसेच तुमच्या मौज-मस्तीत जगत रहाल.

कालच्या हल्ल्यानंतर सरकार व लष्कर त्यांना काय करायचे आहे ते करतीलच, पण आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे की आपल्यापेक्षा अतिरेकी हे जास्त क्रियाशील आहेत, आणि ते दुर्दैवी आहे. ते क्रियाशील आहेत कारण त्यांना एक ध्येय दिले आहे (जरी ते वाईट आणि चुकीचे असले तरीही). पण एक व्यक्ती किंवा समाजाचा एक घटक म्हणून तुमच्यासमोर देशासाठी/समाजासाठी काही करण्याचे कुठलेच ध्येय नाही त्यामुळे आपण निष्क्रिय झालो आहोत. 

IT क्षेत्रात असे म्हणतात की Virus तयार करण्याचा प्रोग्रॅम लिहिणारे हे Antivirus तयार करणाऱ्यांपेक्षा जास्त हुशार असतात आणि काही अंशी ते खरेच आहे, कारण Antivirus प्रोग्रॅम लिहिणे ही फक्त प्रतिक्रिया असते, मात्र नवीन Virus हा मुळापासून लिहायला लागतो! दुर्दैवाने अतिरेकी हे Virus लिहिणारे आहेत आणि आपण सर्वजण फक्त प्रतिक्रिया देणारे आहोत! :-(

पुढील काही दिवस राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करत राहतील, वाहिन्या जोरदार चर्चा घडवून आणतील, पुरोगामी विचारवंत/कलावंत/साहित्यिक यात सरकारचे कसे चुकले आहे ते सांगतील, सिने-नाट्य कलावंत आपापल्या Twitter handle वरून शोकसंदेश देतील, आपण सर्व जण हे सर्व बघत राहू आणि काही दिवसांनी सारे कसे शांत शांत होईल.

या घटनेपासून आपण काय धडा घेणार आहोत? सर्वसामान्य नागरिकांचे आत्तापर्यंतचे वर्तन बघा. मी, माझे कुटुंब, माझे नातेवाईक या पलीकडे बघायला लोक तयारच नाहीत. अहो साधं आपण जिथे राहतो तो परिसर स्वच्छ ठेवणे, आसपासच्या झाडांना पाणी घालणे, वाहतुकीचे नियम पाळणे, आपले कुठलेही काम एकही पैसा लाच म्हणून न देता अथवा न घेता करणे, सार्वजनिक ठिकाणी वागण्याचे समाजमान्य अलिखित संकेत पाळणे यापैकी काहीही आपण करत नाही.  तुम्ही दुसऱ्या माणसांना वेळ देता का, त्यांच्यासाठी काही करता का, याचे उत्तर काही अपवाद वगळता नाही असेच येईल. Whatsapp, Facebook वरून देशभक्तीचे, वाढदिवसाचे, सणासुदीला शुभेच्छांचे संदेश पाठवले म्हणजे झाले असे होत नाही. हॉटेलमध्ये मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात बसून डोसा-चहा खाता-खाता किंवा दोन पेग मारता-मारता आपला देश कसा वाईट आहे आणि काय सुधारायला पाहिजे यावर गप्पा ठोकणारे खूप जण असतात, क्रिकेट मॅच जिंकल्यावर उन्मादाने नाचणारेही बरेच दिसतात. पण हे लोक देशासाठी/समाजासाठी वेळ काढा म्हटले की कारणे द्यायला लागतात.

लोकशाहीने आम्हाला फक्त आमचे हक्क मागायला शिकवलेत, जबाबदारी नाही. आपण कितीही म्हटले की आमचा देश संतांचा आहे तरी वास्तविक आम्ही अजूनही जाती-पातीत अडकलो आहोत. एकीकडे जाती-पाती नष्ट करा म्हणायचे आणि जातीवर आधारित आरक्षणासाठी लढायचे! जिथे सोयीचे असेल तिथे भ्रष्टाचार करायचा. ज्या अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र विषयाला १०० पैकी ५-१० मार्क असतील त्या देशात सुजाण, सजग आणि कार्यशील नागरिक तयार होतीलच कसे?

सुशिक्षित लोकांबद्दल तर पुरता अपेक्षाभंग झालाय. हा वर्ग साधं मतदान पण करत नाही, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीच्या दिवशी भटकायला जाणे, वीकेंडचे प्लॅन्स आखणे आणि मौज-मजा करणे यातच यांचे आयुष्य सरते आणि वर त्याची खंतही वाटत नाही. अन्याय नुसता बघत राहतात आणि सहन करतात. पुण्यातल्या प्रश्नांविषयी शेकडो लोक रोज खाजगीत तक्रारी करत असतात; पण अधिकृतपणे तक्रार नोंदवून, तिचा पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेला भाग पडण्याची कोणाची तयारी नसते. शिवाजी अजूनही दुसऱ्याच्या घरात जन्मावा अशी लोकांची अपेक्षा असते. स्वतःला काहीही त्रास न होता दुसऱ्या कोणी काम करून दिले तर हवेच असते. असली निर्लज्ज मनोवृत्ती आपल्या समाजाची झाली आहे.

  • कधी व्यावसायिक लोक प्रामाणिकपणे व्यवहार करणार आणि कर भरणार?
  • कधी वकील आणि सी. ए. लोक आपल्या अशिलांना कायद्याप्रमाणे वागायला भाग पाडणार?
  • कधी शिक्षक/प्राध्यापक लोक विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे/तळमळीने शिकवणार? आणि क्लास ऐवजी शाळा/कॉलेज मधेच चांगले शिक्षण देणार?
  • कधी नोकरदार वर्ग प्रामाणिकपणे, सचोटीने आणि मन लावून काम करणार?
  • कधी विद्यार्थी वर्ग आपली संध्याकाळ एखाद्या हॉटेलात मौज-मजा न करता काही वेगळे चांगले काम करणार?
  • कधी पालक आपल्या मुलांना अधिक वेळ देऊन, त्यांना चांगलं/वाईट याची समज देऊन एक चांगला नागरिक घडवणार?
  • कधी डॉक्टर आपल्या पेशंटना न लुटता प्रामाणिकपणे औषधोपचार करणार?
  • कधी सिने-नाट्य अभिनेते आपल्या खाजगी आयुष्यात चांगले काम करून समाजापुढे चांगला आदर्श ठेवणार?
  • कधी आपण सर्व जण आपला Gadgets वरील वेळ कमी करून तो चांगल्या विधायक कामासाठी वापरणार?
  • कधी Service Industry मधले लोक ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देणार?

वरील प्रश्नांच्या उत्तरात आपले भविष्य दडलेले आहे. फक्त सरकारवर अवलंबून राहण्याची वृत्ती सर्वप्रथम सोडावी लागेल. स्वतःला एखाद्या चांगले काम करणाऱ्या ज्ञानप्रबोधिनी, 'स्व'-रूपवर्धिनी, वंचित-विकास, चिंचवड येथील गुरुकुलम, रामकृष्ण आश्रम, विवेकानंद केंद्र, सजग नागरिक मंच, ग्राहक मंच, पर्यावरण क्षेत्रातील संस्था, यांसारख्या संस्थेशी जोडून घ्यावे लागेल, त्यासाठी अतिरिक्त वेळ काढावा लागेल.

या देशाचे, समाजाचे आणि पर्यायाने आपल्या सर्वांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याची सर्वात जास्त जबाबदारी पालकांनी स्वीकारली पाहिजे असे मला वाटते. मुलांनी कुठली Gadgets वापरावीत, त्यावर कुठल्या गेम्स खेळव्यात यावर पालकांचे नियंत्रण असलेच पाहिजे. मुलांना मैदानी खेळाची आवड लावण्याची जबाबदारी पालकांनी घेतलीच पाहिजे. त्यासाठी पालकांनी आपले स्वतःचे वर्तन कसे आहे हे तपासून बघितले पाहिजे. आज संकट कोसो दूर आहे पण उद्या ते तुमच्या घरात येऊ शकते. 

स्वातंत्र्यवीर सावरकर एकदा त्यांच्या पत्नीला म्हणाले होते की संसार काय कावळे-चिमण्या पण करतात, आपण असे काहीतरी केले पाहिजे की लोक आपले कार्य आपल्या मरणानंतरही लक्षात ठेवतील. 

आज ३७० कलमामुळे आपण एक नागरिक म्हणून एका मर्यादेपलीकडे काश्मीर साठी काही करू शकत नाही. पण खालील गोष्टी तुम्ही नक्की करू शकता.

तुम्ही बँकेत, LIC त अथवा Financial Company मध्ये किंवा सरकारी कचेरीत काम करत असाल तर लष्करातील जवानांचे काम सोपे आणि लवकरात लवकर होईल असे करा जेणेकरून त्यांना खेपा माराव्या लागणार नाहीत. काश्मीरमध्ये सहलीसाठी गेलात तर तिथल्या स्थानिकांची ओळख करून घ्या व परत आल्यावरसुद्धा त्यांच्याशी संपर्क ठेवा. लष्करातल्या जवानांना हर प्रकारे मदत करा जेणेकरून त्यांची बुद्धी आणि शक्ती व्यर्थ गोष्टीत न दवडता योग्य ठिकाणी खर्च होईल.

तेंव्हा चला, आज आपण सारे मिळून प्रतिज्ञा करू या की मी स्वतः उत्तम नागरिक बनून माझ्या देशासाठी/समाजासाठी सर्वतोपरी काम करेन तसेच माझ्या मुलांनी उद्याचा उत्तम नागरिक बनावे म्हणून प्रयत्न करेन. 

एका कवितेत म्हटले आहे - कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती. 


जयहिंद!

© धनंजय रघुनाथ सप्रे - १५ फेब्रुवारी २०१९