Sunday, 1 October 2023

अनिल विश्वास (भाग १) - हिंदी चित्रपटसंगीताचे भीष्म पितामह

नमस्कार मित्रांनो. आज माझा ५०वा ब्लॉग तुमच्यासमोर सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. गेल्या दहा वर्षात मी पन्नास ब्लॉग कसे लिहू शकलो ह्याचे माझे मलाच आश्चर्य वाटते! असो.

आजच्या ब्लॉगमध्ये मी ज्यांना हिंदी चित्रपटसंगीताचे भीष्म पितामह म्हटले जाते अशा अनिल विश्वास यांचा परिचय करून देणार आहे. अनिल विश्वास हे माझे अत्यंत आवडते संगीतकार आहेत. त्यांच्याबद्दल लिहावे असे बऱ्याच दिवसांपासून मनात होते, शेवटी आज योग आला. १९३२ साली हिंदी चित्रपटात संगीत आल्यापासून सुरुवातीच्या काळातले संगीत हे मोजक्या वाद्यांवर आधारित एका ठराविक धाटणीचे होते, त्याला अनिल विश्वास यांनी आपल्या प्रयोगशीलतेतून एक वेगळे उत्तम स्वरूप दिले. 

अनिल विश्वास यांना त्यांचे रसिक अनिलदा या नावाने ओळखतात, त्यामुळे उर्वरित ब्लॉगमध्ये मी त्यांना अनिलदा नावानेच संबोधणार आहे. अनिलदांची संपूर्ण ३० वर्षाची कारकीर्द एका लेखात मांडणे अशक्य आहे. त्यामुळे मी त्याचे ४ भाग करायचे ठरवले आहे.

भाग १ - यात अनिलदांचे जीवन आणि एकूण संगीत कारकीर्द याचा आढावा घेणार आहे. तसेच त्यांची काही गाणी सादर करणार आहे.
भाग २ - यामध्ये प्रामुख्याने अनिलदांचे लाडके पुरुष गायक - मुकेश, तलत, मन्ना डे आणि किशोर कुमार यांची गाणी सादर करणार आहे.
भाग ३ - या भागात मी अनिल विश्वास यांनी स्वरबद्ध केलेली अप्रतिम द्वंद्वगीते सादर करेन.
भाग ४ - हा भाग संपूर्णतः फक्त आणि फक्त  लता मंगेशकर यांनी गायलेल्या अनिलदांच्या संगीत रचनांवर आधारित असेल.

मला खात्री आहे की चारही भाग आपल्याला आवडतील. चला तर मग, भाग १ ची सुरुवात करू या.


साल : १९६०. स्थळ : अमेरिकेतील एक अद्ययावत रेकॉर्डिंग स्टुडिओ. भारतातील एक अनुभवी आणि प्रसिद्ध संगीतकार तेथील सर्व आधुनिक यंत्रसामुग्री पाहत असतो. ती पाहून झाल्यावर स्टुडिओतील माणूस त्या संगीतकाराला नम्रपणे म्हणतो की तुमच्यासारख्या मोठ्या संगीतकाराला हे सर्व माहिती असेलच. त्यावर तो संगीतकार त्याला म्हणतो "हो, मला माहिती आहे, पण या अत्याधुनिक सोयींशिवाय आम्ही हाच परिणाम साधू शकतो".

असा आत्मविश्वास ज्यांनी आपल्या संगीत रचनांमधून निर्माण केला त्या महान संगीतकाराचे नाव होते अनिल विश्वास. (बंगाली भाषेत "व" हे अक्षर नसल्याने ते "बिस्वास" असं संबोधतात)

आपल्या संगीतामध्ये विविध प्रयोग करण्याबद्दल १९६० नंतर जन्मलेल्या पिढीतील लोकांना R. D. बर्मन उर्फ पंचम हेच एकमेव नाव प्रामुख्याने माहिती आहे. त्यांच्यावर, त्यांच्या संगीत रचनांवर अनेक जणांनी लिहून ठेवलंय, अनेक लोक कार्यक्रम करत असतात. पण पंचमदांच्या कितीतरी आधी म्हणजे किमान दोन दशके आधीपासून अनिल विश्वास यांनी हिंदी सिनेसंगीतात विविध प्रयोग केले आहेत. त्यांनी केलेल्या प्रयोगांवर स्वतंत्र अभ्यास आणि लेख लिहावा लागेल. हिंदी सिनेसंगीतात सर्वप्रथम १२ वाद्यांचा वाद्यवृन्द (Orchestra) आणण्याचे श्रेय संपूर्णतः अनिलदांना जाते.

अनिलदा हे पहिले संगीतकार होते ज्यांनी हिंदी चित्रपट संगीतात Counter Melody चा यशस्वी प्रयोग केला. Counter Melody म्हणजे मुख्य गायक गाणे म्हणत असताना दुसऱ्या गायकाने वेगळ्या सुरात समांतर गाणे म्हणणे किंवा background ला समांतर वाद्यसंगीत वाजवणे. असे केल्याने गाण्याचे माधुर्य वाढते. ही पद्धत नंतर Sebastian D'Souza या प्रसिद्ध संगीत-संयोजकाने शंकर-जयकिशन, ओ. पी. नय्यर, सलील चौधरी या ख्यातनाम संगीतकारांबरोबर काम करताना वापरली.

Courtesy: Archisman Mozumder
हिंदी चित्रपट संगीतात सर्वप्रथम रागमाला (विविध रागात गुंफलेले एक गाणे) सादर करण्याचे श्रेय अनिलदांना द्यावे लागेल. १९५३ सालच्या "हम दर्द" या चित्रपटात लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी गायलेल्या "ऋतू आये ऋतू जाये सखी री" या अप्रतिम गाण्यात अनिलदांनी गौड सारंग, गौड मल्हार, जोगिया आणि बहार असे ४ राग वापरले आहेत! या गाण्याची सुरावट आणि गायकी अद्भुत आहे! अनिलदा म्हणतात "हे गाणे मन्ना डे आणि लता यांच्याशिवाय पूर्ण होऊच शकले नसते!"

अनिल विश्वास यांनी सुधा मल्होत्रा यांना प्रथम गाण्याची संधी दिली त्यांच्या १९५१ सालच्या "आरजू" या चित्रपटात. याशिवाय तलत महमूद आणि मुकेश यांना गायक म्हणून घडवण्यात अनिलदांचा सिंहाचा वाटा आहे. लता मंगेशकर यांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात नूरजहाँ यांच्या प्रभावाखालून बाहेर काढून त्यांच्या स्वतःच्या स्वरप्रतिभेची ओळख करून देण्याचे संपूर्ण श्रेयसुद्धा अनिलदांना जाते. हे कसे ते आपण पुढील भागात विस्ताराने पाहणार आहोत. 

७ जुलै १९१४ रोजी तेंव्हाच्या पूर्व बंगाल (आता बांगला देश) मधील बारिसाल या गावात अनिल विश्वास यांचा जन्म झाला. बारिसाल ही तत्कालीन सुप्रसिद्ध क्रांतिकारक अश्विनीकुमार दत्त यांची कर्मभूमी होती. त्यांचे वडील जगदीशचंद्र विश्वास सरकारी नोकर होते. तर आई यामिनीदेवी यांना संगीतात गोडी होती, त्या उत्तम भजन गायच्या. १९१४ साली पहिल्या महायुद्धाचे वारे भारतातही पसरले होते. तसेच १९०५ साली इंग्रजांनी केलेल्या बंगालच्या फाळणीमुळे त्यांच्याविरुद्ध लोकांत रोष होता. या सर्व वातावरणामुळे लहान वयातच अनिल विश्वास यांच्या मनात क्रांतीची बीजे पेरली गेली होते. त्यांनी शाळेत असताना काही काळ स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला, व यासाठी त्यांना ५-६ वेळा तुरुंगवासही भोगायला लागला होता. अखेरीस त्यांना त्यांच्या आईच्या भक्तिसंगीताने क्रांतीच्या मार्गाकडून संगीताच्या मार्गाकडे वळवले.

आई यामिनीदेवींनी लहानग्या अनिलला संगीताची शिकवणी लावली. वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी अनिल तबला पारंगत झाले. याशिवाय त्यांनी शास्त्रीय संगीतातील ख्याल, ठुमरी, दादरा हे प्रकारही शिकून घेतले. बंगालमध्ये प्रचलित असलेले श्यामा संगीत आणि कीर्तन यातही त्यांनी प्राविण्य मिळवले. आईबद्दल अनिलदा कायम ऋणी राहिले, आईबद्दल बोलताना अनिलदा कबीरांच्या एका दोह्याचा उल्लेख करत तो असा:

सात समंद की मसि करौं, लेखनि सब बनराई ।
धरती सब कागद करौं, तऊ हरि-गुन लिख्या न जाई ।।
(सात समुद्रांतील पाण्याची शाई केली, सर्व वनांतील झाडांची लेखणी केली,
संपूर्ण धरतीचा कागद केला, तरी हरी म्हणजे परमेश्वराचे गुणवर्णन केले जाऊ शकत नाही.)

१९३० साली अनिलदांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर मात्र अनिलदांनी कलकत्ता येथे जाण्याचा आणि आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. कलकत्यामध्ये त्यांची भेट बंगालमधील सुप्रसिद्ध कवी-संगीतकार काज़ी नजरूल इस्लाम तसेच मंजू खाँ साहेब मुर्शिदाबादी यांच्याशी झाली. या दोघांच्या सहवासात अनिलदांना गज़लचे वेड लागले. 

कलकत्त्याला आल्यावर अनिलदा जिथे संधी मिळेल तिथे गात होते, अभिनय करत होते, गाण्यांना चाली लावत होते. कलकत्त्यामध्ये राहून अनिलदांनी रंगमहल थिएटर साठी " थेङक", "महानिशा", "पतिव्रता", "बांग्लार मेये" आणि "अशोक आणि रावण" ह्या नाटकांचे संगीत दिग्दर्शन केले, त्यासाठी गाणी लिहिली, अभिनय केला आणि नृत्य सुद्धा केले! याशिवाय "कजरी" नावाच्या बॅलेची कल्पना, रचना आणि त्यात अभिनय केला. बंगाली रंगमंचावर झालेला हा पहिलाच बॅले होता.

त्यानंतर थोडा काळ अनिलदांनी हिंदुस्थान म्युझिकल कंपनीत काम केले. त्यावेळेस त्यांच्याबरोबर कुंदनलाल सहगल आणि सचिनदेव बर्मनही तिथेच काम करत होते! एके दिवशी तिथे कलकत्त्यातील प्रसिद्ध संगीतकार हिरेन बोस आले, त्यांनी अनिलदांची गाणी ऐकली होती, त्यामुळे हिरेन बोस यांनी अनिलदांना "माझ्याबरोबर मुंबईला येतोस का?" असे विचारले. मुंबईला जाण्याचा प्रस्ताव म्हणजे अनिलदांना नवीन क्षितिज खुणावते आहे असे वाटले व ते लगेच तयार झाले. पण प्रश्न होता मुंबईला जाऊन संगीतामध्ये आपली वेगळी ओळख कशी काय निर्माण करणार? अनिलदा म्हणाले की मुंबईच्या हिंदी चित्रपटांमध्ये तोपर्यंत वाद्यवृंद वापरत नव्हते, आपण आपला वाद्यवृंद घेऊन जाऊ आणि अशी नवीन गाणी करू की जी आजपर्यंत लोकांनी ऐकली नसतील. त्यांनी चार वादक शोधले की जे विविध वाद्ये वाजवण्यात निपुण होते - १) डिक्रूज - व्हायोलिन आणि पियानो, २) मिस्टर पॉवर - हवाईयन गिटार, ३) मिस्टर आबेल - गोवा संगीत निपुण, ट्रम्पेट आणि व्हायोलिन, आणि ४) लिनू अथैय्या - मेंडोलिन, व्हायोलिन आणि चेलो. अशा एकूण ६ लोकांच्या चमूने १७ डिसेंबर १९३४ रोजी मुंबईच्या धरतीवर पाऊल ठेवले. त्यानंतर घडला तो हिंदी चित्रपटसंगीताचा सुरेल, सुमधुर इतिहास!

थोड्याच दिवसांत अनिलदांना राम दरयानी यांच्या अजंठा स्टुडिओज (Eastern Art Syndicate) मध्ये नोकरी मिळाली. आणि १९३५ साली प्रदर्शित झालेल्या "धर्म की देवी" या चित्रपटाने अनिलदांचा संगीतकार म्हणून हिंदी चित्रसृष्टीत प्रवेश झाला. दिग्दर्शक होते त्यांचे मित्र हिरेन बोस. अनिलदा यांनी या चित्रपटात एका फकिराची भूमिका पण केली होती. "धर्म की देवी" मध्ये एकूण ३ गाणी होती, त्यातील पहिले गाणे "कुछ भी नहीं भरोसा, दुनिया है आनी जानी" हे अनिलदांनी एका सिंधी लोकगीताच्या चालीवर तयार केले होते. आणि योगायोग म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचे गाणे १९६५ मधील “छोटी छोटी बातें” या चित्रपटातील “अंधी दुनिया, मतलब की दुनिया, हाय रे दुनिया” हेही गाणे एका सिंधी गाण्याच्या प्रकारावरून रचलेले होते. त्यामुळे अनिलदा असं गंमतीने म्हणायचे की “माझं सर्व चित्रपट संगीत दोन सिंधी गाण्यांच्या मध्ये सँडविच झाले होते!” 😀😂

Ashalata Biswas 
पुढील २ वर्षात अनिलदांनी अजंठा स्टुडिओजसाठी (Eastern Art Syndicate) "धर्म की देवी" शिवाय एकूण १० चित्रपटांना संगीत दिले. याच दरम्यान अनिलदांच्या आयुष्यात आशालता (मूळ नाव मेहरुन्निसा मूसा भगत) ही त्याकाळची गाजलेली नायिका आली. कालांतराने दोघे विवाहबद्ध झाले. त्यांना प्रदीप, अमित, उत्पल आणि शिखा अशी चार अपत्ये झाली. दुर्दैवाने त्यांचा थोरला मुलगा प्रदीप याचा १९६१ साली एका विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेने अनिलदा पूर्ण खचून गेले होते.

Mehboob Khan
१९३६ मध्ये अनिलदा सागर मूव्हीटोन येथे संगीतकार म्हणून रुजू झाले. हे त्यांच्या आयुष्यातले एक महत्वाचे वळण ठरले कारण इथे त्यांची भेट प्रसिद्ध दिग्दर्शक मेहबूब खाँ यांच्याशी झाली. ही ओळख पुढे गाढ मैत्रीत बदलली आणि मेहबूब खाँ यांच्या मृत्यूपर्यंत कायम राहिली. मेहबूब खाँ दिग्दर्शित १९३७ साली प्रदर्शित झालेला "जागिरदार" हा चित्रपट अनिलदांचा पहिला सुपरहिट चित्रपट ठरला. चित्रपटात एकूण ९ गाणी होती, त्यातील "वही पुराने खेल जगत के, वही पुरानी बात" हे स्वतः अनिल विश्वास यांनी गायलेले गाणे खूप गाजले. याशिवाय इतरही गाणी लोकांना खूप आवडली. 

"जागिरदार" च्या यशानंतर अनिलदांनी सागर मूव्हीटोन बरोबर आणखीन काही चित्रपटांचे स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शन केले. १९३९ मध्ये सागर मूव्हीटोन ही कंपनी नॅशनल स्टुडिओज या कंपनीत विलीन झाली. तिथे अनिलदांनी एकूण ९ चित्रपटांना संगीत दिले. त्यापैकी २ चित्रपट त्यातील गाण्यांमुळे खूप गाजले. "औरत" (१९४०) आणि "रोटी" (१९४२) हे ते चित्रपट होत. "रोटी" मध्ये अख्तरीबाई फैजाबादी या प्रमुख भूमिकेत होत्या, ज्या पुढे बेग़म अख़्तर म्हणून प्रसिद्ध गायिका आणि गज़ल सम्राज्ञी म्हणून ओळखल्या गेल्या. 

१९४२ च्या शेवटी अनिलदांनी बॉम्बे टॉकीज येथे काम सुरु केले. १९४३ साली प्रदर्शित झालेला "किस्मत" हा अशोककुमार, मुमताज शांती यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट प्रचंड गाजला, त्याबरोबरच त्यातील गाणीही. अमीरबाई कर्नाटकी यांनी गायलेली २ गाणी "धीरे धीरे आ रे बादल धीरे आ रे" आणि "घर घर में दिवाली है" तसेच अनिल विश्वास यांची बहीण पारुल घोष (सुप्रसिद्ध बासरीवादक पं. पन्नालाल घोष यांची पत्नी) यांनी गायलेले "पपीहा रे मेरे पिया से कहियो जाय" ही गाणी आजही रसिकांना आवडतात. याच चित्रपटातील "दूर हटो ऐ दुनियावालों हिंदुस्तान हमारा है" या गाण्याने जनतेच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत फुलवली. "किस्मत" चित्रपट भारतीय चित्रसृष्टीतीतील पहिला चित्रपट ठरला ज्याने त्या काळात १ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आणि जो कलकत्त्यातील रॉक्सि सिनेमा थिएटर मध्ये तब्बल १८७ आठवडे चालला. हा विक्रम "शोले" चित्रपट येईपर्यंत अबाधित होता!

१९४४ मध्ये आलेल्या "ज्वार भाटा" या दिलीप कुमार याच्या पहिल्या चित्रपटाला अनिलदा यांचेच संगीत होते. तसेच १९४५ मधील "पहली नज़र" या चित्रपटात अनिलदांनी मुकेश माथूर या नवोदित गायकाला चित्रपट गीत गायनाची प्रथम संधी दिली. 

१९४७ मध्ये अनिलदांनी बॉम्बे टॉकीज सोडली आणि स्वतंत्र संगीतकार म्हणून काम करायचे ठरवले. स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात केल्यानंतर अनिलदांच्या प्रतिभेने पुढील दहा वर्षात अशी काही झेप घेतली ज्यातून निर्माण झाले "अनिलदा युग". या युगाची सुरुवात झाली १९४८ मध्ये आलेल्या "अनोखा प्यार" या चित्रपटाने. याच चित्रपटाद्वारे अनिल विश्वास आणि लता मंगेशकर या सिनेसंगीतातील बहु-प्रतिभाशाली जोडीची सुरुवात झाली. अनिलदांनी एके ठिकाणी म्हटलंय "लता चित्रपट संगीत क्षितिजावर आली आणि आम्हा संगीतकारांना जणू काही संगीताचे विविध प्रयोग करण्याचे भले मोठे दालन खुले झाले कारण तिचा कोवळा पण धारदार आवाज, तिची रेंज आणि मुख्य म्हणजे तिची शास्त्रीय संगीताची जबरदस्त तयारी". याविषयी अधिक जाणून घेऊ या शेवटच्या म्हणजे चौथ्या भागात.

१९४९ सालच्या "आरजू" चित्रपटातून अनिलदांनी आणखीन एका नौजवान पण होतकरू गायकाला संधी दिली, आत्मविश्वास दिला, त्याचे नाव होते तलत महमूद. 

१९५४ साली अनिल विश्वास आणि आशालता यांचा घटस्फोट झाला. पुढे १९५९ साली अनिलदांनी त्यांची १९४८ मधील "अनोखा प्यार" चित्रपटापासूनची गायिका मीना कपूर हिच्याशी विवाह केला. 

१९४८ ते १९५९ या बारा वर्षात अनिलदांनी खालील २३ चित्रपटातून २०१ एक-से-एक सुमधुर,लाजवाब आणि अजरामर गाणी रसिकांना दिली. यातील प्रत्येक गाणं म्हणजे बावनकशी सोनं आहे.


अनिल विश्वास यांनी त्यांच्या १९३५ ते १९६५ अशा तब्बल ३१ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकूण ९४ चित्रपटांना संगीत दिले. त्यापैकी मी संकलित केलेल्या यादीनुसार एकूण ७४ हिंदी चित्रपटातून ५७९ गाणी आहेत. १९३५ ते १९४७ या काळात विविध कंपन्यांमध्ये संगीतकार म्हणून नोकरी करत असताना अनिलदांनी एकूण २७ चित्रपटात २१८ गाणी स्वरबद्ध केली होती. म्हणजे त्यांच्या कारकिर्दीच्या ३५% चित्रपट आणि ३७% गाणी त्यांनी पहिल्या १२ वर्षातच दिली!

अनिलदांनी एकूण ७५ गायकांना आपली गाणी गाण्याची संधी दिली. त्यातील २२% गाणी एकट्या लताने म्हटली आहेत!




ज्याला "अनिल विश्वास संगीत शाळा" (Anil Biswas School of Music) असे म्हणता येईल, त्यातून रोशन, मदनमोहन, सी. रामचंद्र आणि ओ. पी. नय्यर अशा अनेकांनी प्रेरणा घेऊन, शिकून पुढे स्वतःची दैदिप्यमान कारकीर्द घडवली. म्हणूनच ९०च्या दशकातील एका कार्यक्रमात नौशाद आणि ओ. पी. नय्यर यांनी अनिलदांना "हिंदी चित्रसंगीताचे भीष्म पितामह" अशी उपमा दिली. 

अनिलदांना १९८६ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. पण या महान संगीतकाराला इतक्या वर्षांनंतरही प्रतिष्ठेचा पद्म पुरस्कार मिळू शकला नाही याची खंत रसिकांना वाटत राहील.

१९६५ साली आलेला "छोटी छोटी बातें" हा अनिलदांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर अनिलदा चित्रपट दुनियेतून स्वतःहून बाजूला झाले. १९६३ ते १९६५ अनिलदा All India Radio च्या राष्ट्रीय वाद्यवृंदाचे संचालक होते. १९८४ साली दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका "हम लोग" याचे संगीतही अनिलदांनीच दिले होते.

असा हा महान, प्रतिभावान संगीतकार ३१ मे २००३ रोजी आपल्याला सोडून गेला. अनिलदांचे "ऋतू आये ऋतू जाये" हे चरित्र ज्यांनी लिहिले आहे त्या शरद दत्त यांना मुलाखत देताना अनिलदांनी त्याचा शेवट खालील कविता ऐकवून केला होता. आज आपण त्यांचे स्मरण त्याच कवितेतून करू या.

अफ़सोस अजल ले चली मैखाने से 
बन जाएँगे कुछ देर में अफ़साने सें |
मेरे गीत बेवजह गर याद आ जाएँ
छलका देना इक जरा पैमाने सें ||

(माझा मृत्यू मला या मधुशालेतून घेऊन चालला आहे,
याचे मला दुःख आहेच
आता काही वेळातच यावर गीते बनतील. 
जर माझी गीते विनाकारण आठवली 
तर तुमच्या प्याल्यातून जरा ती हिंदकळू देत)


आजच्या भागात मी अनिलदांनी स्वरबद्ध केलेली ६ गाणी सादर करणार आहे जी त्यांचे प्रमुख गायक/गायिका सोडून इतरांनी गायली आहेत.

१) काहे करता देर बाराती - औरत (१९४०) - गायक स्वतः अनिल विश्वास आणि समूह - गीतकार डॉ. सफदर आह

या चित्रपटात एकूण १४ गाणी होती, त्यापैकी ६ गाण्यांना अनिलदांनी आपला आवाज दिला आहे. या चित्रपटातील हे सर्वात प्रभावी गीत. चित्रपटाची कथा शेतकरी आणि कुटुंबाची असल्याने अनिलदांनी यातील गाणी करताना भारतीय शास्त्रीय संगीताला लोकसंगीताची जोड दिली. पुढे १९५७ साली याचाच रिमेक "मदर इंडिया" आला, बाकी सर्व तेच होते, फक्त त्यात अनिल विश्वास नव्हते.


२) दूर हटो ऐ दुनियावालो हिंदुस्तान हमारा है - किस्मत (१९४३) - अमीरबाई कर्नाटकी, अरुणकुमार, प्रदीप आणि अनिल विश्वास - गीतकार कवी प्रदीप

डाव्या विचारांचा लहानपणापासून असलेला प्रभाव, त्यातून निर्माण झालेली इंग्रजांविषयीची चीड या सर्वांचा उपयोग अनिलदांनी या गाण्यातून केला आहे. प्रचंड ताकदीचे हे समूहगीत आहे. या गाण्यांतून जोश निर्माण करण्यासाठी अनिलदांनी लष्कराच्या बँडच्या धर्तीवर स्वररचना केली आहे. 


३) मैं उनकी बन जाऊं रे - हमारी बात (१९४३) - पारुल घोष - गीतकार पं. नरेंद्र शर्मा

अनिलदांनी स्वरबद्ध केलेले हे आणखी एक गोड गीत. त्यांच्या बहिणीच्या म्हणजे पारुल घोष यांच्या आवाजात. यातील तालवाद्य ऐकताना बंगाली रवींद्र संगीताचा भास होतो.


४) दूर पपीहा बोला रात आधी रह गयी - गजरे (१९४८) - सुरैय्या - गीतकार गोपाल सिंग नेपाली

सुरैय्याने अनिलदांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेल्या एकूण १४ सोलो गीतांपैकी हे सर्वात गाजलेले सुरेल गाणे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत मोतीलाल आणि सुरैय्या होते.


५) ले जा उसकी दुवाएं ओ, जो तेरा हो ना सका - हीर (१९५६) - मोहम्मद रफ़ी - गीतकार मजरूह सुलतानपुरी

रफींनी अनिलदांकडे फक्त ४ सोलो गाणी म्हटली आहेत. त्यातील हे एक दर्दभरे गीत. अनिलदा आणि रफी ही जोडी का जमली नाही हे एक रसिक म्हणून मला पडलेलं कोडंच आहे. रफी साहेबांनी या गाण्यात नेहमीप्रमाणे आपला जीव ओतलाय.


६) कच्ची है उमरिया कोरी है चुनरिया - चार दिल चार राहें (१९५९) - मीना कपूर - गीतकार साहिर लुधियानवी 

ख्वाजा अहमद अब्बास या साम्यवादी दिग्दर्शकाने या चित्रपटातून तत्कालीन भारतीय समाजात घडणारे बदल चार वेगवेगळ्या कथांमधून दाखवले आहेत. या चित्रपटात राज कपूर, शम्मी कपूर, मीना कुमारी, अजित, निम्मी, अन्वर हुसेन, नाना पळशीकर अचला सचदेव आणि डेव्हिड अशी तारकांची मांदियाळी होती. हे मीना कपूर यांनी गायलेले, मीना कुमारीवर चित्रित झालेले आणि तुफान गाजलेले गीत. या गाण्यात मीनाकुमारी एक आदिवासी अस्पृश्य मुलगी दाखवली आहे. ती राहत असलेल्या आदिवासी पाड्यावर हे गीत सादर होते, त्यामुळे अनिलदांनी लोकसंगीताचा खुबीने वापर करून वातावरण निर्मिती छान केली आहे. गाण्याचा वेग आणि कोरस यांनी गाण्याला उठाव येतो.



अनिलदांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. आशा आहे की आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल. आपली प्रतिक्रिया ब्लॉगच्या खाली जरूर नोंदवा. धन्यवाद.


संदर्भ:
१) ऋतू आये ऋतू जाये - संगीतकार अनिल विश्वास यांचे चरित्र - मूळ लेखक शरद दत्त - मराठी अनुवाद शरयू पेडणेकर - प्रथम आवृत्ती पद्मगंधा प्रकाशन 
२) विकिपीडिया 
३) लता मंगेशकर - एका गायिकेचा प्रवास - मूळ लेखक राजू भारतन - मराठी अनुवाद सौ. लीना सोहोनी - द्वितीय आवृत्ती मेहता पब्लिशिंग हाऊस
४) सर्व फोटो इंटरनेट वरून साभार
५) गाण्यांची यादी https://m.hindilyrics4u.com/music_director/anil_biswas.php?page=59 वरून साभार 
६) Biography of Anil Biswas by David Courtney https://chandrakantha.com/biodata/Anil_Biswas.html

Sunday, 23 July 2023

अनमोल रतन - 16 : A Naushad-Talat Mahmood Gem

Namaskaar Friends,

Very happy to share the next song in the अनमोल रतन series. Hope you will like it.

The English version of the blog will follow the Marathi version below.

गीत #१६: हुस्नवालों को ना दिल दो यह मिटा देते है


चित्रपट: बाबुल (१९५०)

दिग्दर्शक: S. U. सुन्नी

कलाकार: दिलीपकुमार, नर्गिस, मुनवर सुलताना, उमादेवी (टुनटुन)

गीतकार: शकील बदायुनी

संगीतकार: नौशाद

गायक: तलत महमूद

नमस्कार. आज सादर करत असलेले गाणे हे १९५० सालच्या "बाबुल" या चित्रपटातले आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक होते नौशाद. नौशाद हे या चित्रपटाचे निर्माते देखील होते. नौशाद यांनी संगीतकार म्हणून स्वतंत्रपणे काम १९४० साली सुरु केले. त्यांना पहिले यश मिळाले ते १९४२ सालच्या "शारदा" या चित्रपटामुळे. या चित्रपटात त्यांनी सुरैय्या या गायक-अभिनेत्रीला गायनाची पहिली संधी दिली होती. १९४४ सालच्या "रतन" या चित्रपटातील संगीत तुफान गाजले आणि त्यामुळे नौशाद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे संगीतकार झाले. असं म्हणतात की "रतन" च्या यशानंतर नौशाद प्रत्येक चित्रपटासाठी त्या काळात रु. २५,०००/- इतके मानधन घेत असत! आणि ते देणारे निर्मातेही त्यांना मिळत असत इतकी त्यांच्या संगीताला मागणी होती! "अनमोल घडी" आणि "शाहजहाँ" (१९४६), "दर्द", "ऐलान" (१९४७), "अनोखी अदा", "मेला" (१९४८), "अंदाज", "दिल्लगी", "दुलारी" (१९४९) हे नौशाद यांचे गाजलेले चित्रपट.

नौशाद यांनी अनेक गायिकांबरोबर काम केले उदा. नूरजहाँ, अमीरबाई कर्नाटकी, जोहराबाई अंबालावाली, शमशाद बेगम, राजकुमारी, सुरैय्या, लता मंगेशकर, आशा भोसले, इ. पण पुरुष गायक मात्र संख्येने थोडे होते. मोहम्मद रफी हे त्यांचे सर्वात आवडते गायक होते. जवळपास १५० गाणी त्यांनी रफी यांच्याकडून गाऊन घेतली. मुकेश यांना नौशाद यांनी "मेला" (१९४८), "अनोखी अदा" (१९४८), "अंदाज" (१९४९) आणि "साथी" (१९६८) या चारच चित्रपटांसाठी घेतले. वास्तविक पाहता मुकेश यांची काही सर्वोत्कृष्ट गाणी ही नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखालीच आहेत. असे असताना देखील "अंदाज" नंतर नौशाद यांनी मुकेशना का घेतले नाही हे एक कोडेच आहे!

नौशाद आणि तलत महमूद ही जोडी मात्र फक्त आणि फक्त "बाबुल" (१९५०) या एकाच चित्रपटासाठी एकत्र आली. त्यांनी नंतर एकत्र काम केले नाही हे रसिकांचे दुर्दैव. "बाबुल" या चित्रपटात एकूण १३ गाणी आहेत. सर्व मिळून अंदाजे ४५ मिनिटांची गाणी आहेत. त्यातील तलतने २ सोलो आणि ४ गाणी इतरांबरोबर गायली आहेत. आणि सर्वच्या सर्व गाणी अतिशय लोकप्रिय आहेत. 

अरे हो! नाही म्हणायला तलतने आणखीन एक गाणे नौशाद यांच्यासाठी १९६८ सालच्या "आदमी" चित्रपटात मोहम्मद रफी यांच्याबरोबर गायले होते. गाणे होते - "कैसी हसीन रात बहारों की आज है". चित्रपटात रफी साहेबांचा आवाज दिलीपकुमार यांच्यासाठी तर तलत यांचा आवाज मनोजकुमार यांच्यासाठी वापरला जाणार होता. पण कुठे काय बिनसले माहिती नाही, पण चित्रपटातील मनोजकुमार यांचे गाणे तलत यांच्याऐवजी महेंद्र कपूर यांनी गायले! आज YouTube वर दोन्ही versions बघायला/ऐकायला मिळतात. असो.


थोडेसे चित्रपटाविषयी:

दिलीपकुमार आणि नर्गिस ही त्या काळातील लोकप्रिय जोडी आणि नौशाद यांचे अप्रतिम संगीत. यामुळे हा चित्रपट व त्यातील गाणी तुफान लोकप्रिय झाली. १९५० साली या चित्रपटाने जवळपास एक कोटी पंचवीस लाख रुपयांचा गल्ला जमवला होता!

अशोक (दिलीप कुमार) एका श्रीमंत घरातला मुलगा असतो. तो पोस्टमास्तरची नोकरी करत असतो. पण नोकरी करत असतानासुद्धा फावल्या वेळात तो चित्र काढणे, कविता लिहिणे इ. शौक पुरे करत असतो. ज्या पोस्ट ऑफिसमध्ये तो नोकरी करत असतो तेथून निवृत्त झालेले पोस्टमास्तर यांची मुलगी बेला (नर्गिस) ही अतिशय गरीब, साधी मुलगी अशोकच्या प्रेमात पडते आणि त्याच्याशी लग्न करण्याचे स्वप्न बघायला लागते. तिचा लाघवी स्वभाव अशोकला आवडत असतो, पण त्याचे प्रेम उषा (मुनवर सुलताना) या एका जमीनदाराच्या मुलीवर बसते. उषाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात उषा आवाज खराब असल्याने गाऊ शकत नाही, त्यामुळे लोकं अशोकला गाण्याचा आग्रह करतात. आणि तो हे अप्रतिम गीत सादर करतो.

आजचे गाणे हे तलत महमूद यांनी गायलेले असून दिलीपकुमार यांनी पडद्यावर ते अतिशय ताकदीने सादर केले आहे. तलत-दिलीप ही गायक-अभिनेता जोडी आपल्याला अनेक गाण्यांतून दिसली आहे. ही सर्व गाणी अतिशय गाजलेली आहेत. काही गाण्यांची यादी खाली देत आहे, त्याकडे नजर टाकली तर लक्षात येईल.

१) ऐ दिल मुझे ऐसी जग़ह ले चल जहाँ कोई न हो - आरज़ू (१९५०) - मजरूह सुलतानपुरी - अनिल विश्वास

२) शाम-ए-ग़म की क़सम - फुटपाथ (१९५३) - अली सरदार जाफ़री आणि मजरूह सुलतानपुरी - खय्याम 

३) हम दर्द के मारों का इतना सा फ़साना है - दाग (१९५२) - हसरत जयपुरी - शंकर जयकिशन

४) ऐ मेरे दिल कहीं और चल - दाग (१९५२) - हसरत जयपुरी - शंकर जयकिशन

५) ये हवा ये रात ये चाँदनी - संगदिल (१९५१) - राजेंद्र कृष्ण - सज्जाद हुसैन 

६) मेरा जीवन साथी बिछड़ गया - बाबुल (१९५०) - शकील बदायुनी - नौशाद 


आज जे गाणे सादर करत आहे त्या गाण्याची काही वैशिष्ट्ये:


१) तलतची प्रतिमा दुःखी, दर्दभरी गीते गाणारा अशी आहे/होती, त्याला छेद देणारे हे रोमँटिक पण जरासे उपरोधिक गाणे आहे. 

२) जी तरुण मुले प्रेमात पडू इच्छितात किंवा पडली आहेत त्यांना सावध करणारे हे गाणे आहे. त्यांचा प्रियकर किंवा प्रेयसी कशी असू शकते याचे यथायोग्य वर्णन शकील बदायुनी यांनी या गीतात केले आहे.

३) या गाण्याची चाल इतकी अप्रतिम आहे की साथीला फक्त हार्मोनियम आणि तबला असूनही गाणे उठावदार झाले आहे.

४) तलतची कसदार, भावनाप्रधान गायकी आणि दिलीपकुमारचा अभिनय या दोन्हींचा सुरेख संगम या गाण्यात झाला आहे. तसा तो आपल्याल्या "ये हवा ये रात ये चाँदनी" या "संगदिल" चित्रपटातील गाण्यातही दिसतो. दोन्ही गाण्यात दिलीपकुमार ते गाणे उप-नायिकेला उद्देशून गातो न की नायिकेला. "बाबुल" मध्ये नर्गिस ऐवजी मुनवर सुलतानाला तर "संगदिल" मध्ये मधुबाला ऐवजी शम्मीला!

५) सुप्रसिद्ध गज़ल गायक मेहदी हसन यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात एका मैफलीत हे गाणे गाऊन प्रेक्षकांकडून भरपूर वाहवा मिळवली होती - हा किस्सा माझे मित्र आणि फिल्म संगीताचे अभ्यासक अद्वैत धर्माधिकारी यांनी सांगितला आहे.

या सुमधुर गाण्याचा आनंद आपण जरूर घ्यावा व प्रतिक्रिया द्यावी ही विनंती. धन्यवाद.



Song #16: Husnawalon Ko Naa Dil Do Yeh Mitaa Dete Hain

Film: 
Babul (1950)

Director: S. U. Sunny

Cast: Dilip Kumar, Nargis, Munawar Sultana, Uma Devi (Tun Tun)

Lyrics: Shakeel Badayuni

Composer: Naushad

Singer: Talat Mahmood

Presenting today is a beautiful song from the 1950 film "Babul" produced and musically composed by Naushad. Naushad was the most sought after music composer in 1950. He started his career in 1940; however, it was 1942 film "Sharada" which gave him his first success. In this film, Naushad had given a break to Suraiyya who went on to become one of the most popular singer-actor later. And then came the superhit film "Ratan" in 1944. Naushad's songs became a hit and he became the household name. He was so popular that he began to demand Rs. 25,000/- for every film, this is way back in 1944! Surprisingly, he got the producers who had a complete faith in Naushad's abilities and were ready to pay him the amount he had demanded.

After the grand success of "Ratan", Naushad continued his finest run and gave us many more gems through the films like "Anmol Ghadi" and "Shahjehan" (1946), "Dard", "Ailaan" (1947), "Anokhi Ada", "Mela" (1948) and "Andaz", "Dulari", "Dillagi" (1949). 

Naushad worked with almost all female singers of those times E.g. Noorjehan, Ameerbai Karnataki, Zoharabai Ambalawali, Shamshad Begum, Suraiyya, Rajkumari, Lata Mangeshkar and Asha Bhosale to name a few. Compared to female singers, the number of male singers with whom Naushad worked was less. His favorite male singer was the legendary Mohammad Rafi who sang approx. 150 songs under Naushad. While Mukesh had only 26 songs for Naushad in 4 films viz. "Mela" (1948), "Anokhi Ada" (1948), "Andaz" (1949) and "Saathi"(1968). In spite of singing some of his best songs for Naushad, one still cannot explain why Naushad did not use Mukesh any further.

Talat Mahmood had unfortunately sung for Naushad only in "Babul" (1950). This film had total 13 songs in it out of which Talat sang 2 wonderful solos and 4 duets. All 13 songs were extremely melodious and popular. Yet Naushad did not work with Talat again, and thus his fans were left disappointed.

My friend Advait Dharmadhikari updated me that Talat had also sung one more song for Naushad in the 1968 film "Aadmi" viz. "Kaisi Haseen Raat Baharon Ki Aaj Hai" along with Mohammad Rafi. However, Talat was replaced later by Mahendra Kapoor whose version with Rafi was used in the movie! Fortunately, both the versions are available on YouTube.

Brief about the film:

Thanks to the most popular on-screen pair of Dilip Kumar and Nargis along with extremely melodious music of Naushad, "Babul" was hugely successful, its gross collection was more than 1 crore in 1950! 

Ashok (Dilip Kumar) hails from a wealthy family but works as a Post Master. He is fond of painting and writing poems which he manages thanks to his light work load at the Post Office. Bela (Nargis) who is the daughter of the retired Post Master of the same Post Office is a simple young girl. Bela falls in love with Ashok and starts dreaming about marrying him. However, Ashok falls for another wealthy young beautiful girl - Usha (Munawar Sultana) and both share their feelings with each other. Ashok is invited for Usha's Birthday celebration where he grudgingly agrees to sing a song, which is being presented here.

Today's song is sung by the legendary singer Talat Mahmood, and it has been picturized on Dilip Kumar. There are many beautiful songs that the duo of Talat and Dilip Kumar have given us. Some of them are:

1) Ai Dil Mujhe Aisi Jagah Le Chal - Arzoo (1950) - Majrooh Sultanpuri - Anil Biswas

2) Sham-E-Gham Ki Kasam - Footpath (1953) - Ali Sardar Jafri/Majrooh Sultanpuri - Khayyam

3) Hum Dard Ke Maaron Ka - Daag (1952) - Hasrat Jaipuri - Shankar Jaikishan

4) Ai Mere Dil Kahin Aur Chal - Daag (1952) - Hasrat Jaipuri - Shankar Jaikishan

5) Yeh Hawa Yeh Raat Yeh Chandani - Sangdil (1951) - Rajendra Krishna - Sajjad Hussain

6) Mera Jeevan Saathi Bichad Gaya - Babul (1950) - Shakeel Badayuni - Naushad

USP of the song being presented today:


1) Talat Mahmood was known for his sad songs, Ghazals. However, this particular song is totally different in its mood contrary to what Talat's genre was. It is not just romantic but has a tinge of sarcasm to it.

2) The song presents a word of caution for those who are yet to fall in love or have already fallen. It aptly describes the probable nature of their would-be. 

3) The composition of the song is so brilliant that one hardly notices that there are no accompanying instruments other than Harmonium and Tabla.

4) The song is a perfect blend of outstanding singing prowess of Talat Mahmood and equally brilliant on-screen performance by the great Dilip Kumar. I remember a similar song by the two "Yeh Hawa Yeh Raat Ye Chandani" from Sangdil (1951) composed by Sajjad Hussain. In both these songs, he hero of the film Dilip Kumar sings the song addressing it to the lady in the assisting role and not the Heroine herself. E.g. in "Babul", he sings it for Munawar Sultana and not Nargis, while in "Sangdil", he sings it for Shammi instead of Madhubala.

5) Lastly, my dear friend and Hindi film songs expert - Advait Dharmadhikari - told me that the song being presented today was sung by the legendary Ghazal singer Mehdi Hasan in one of his first few public programs and it evoked a great response.

Please watch the song and enjoy its beauty, video is given just before the English write-up. Kindly share your comments. Thank you.


Sunday, 18 June 2023

Shyam Sundar - An extraordinary composer

Namaskaar friends,

It's my pleasure to present my new blog on yet another stalwart music composer of the Hindi film industry viz. Shyam Sundar.

Please do read, watch the songs presented herein and share further if you like it. Thank you.

English version of the blog follows the Marathi version below. 

All photos/images in this blog are courtesy YouTube.


११ फेब्रुवारी १९८२ ची ती संगीतमय संध्याकाळ हिंदी चित्रपटसृष्टी आणि रसिकांसाठी अजरामर ठरली. असं काय झालं होतं त्या संध्याकाळी? हिंदी चित्रपट "बोलका" होऊन बरोब्बर ५० वर्षे लोटली होती. त्यानिमित्त Cinema Vision India या श्री. सिद्धार्थ काक यांच्या कंपनीने Music Directors' Association यांच्या सहकार्याने मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये "Mortal Men Immortal Melodies" नावाच्या संगीत रजनीचं आयोजन केलं होतं. या संगीत रजनीला आणखीन एक निमित्त होतं. 

Noorjehan and Dilip Kumar
एकेकाळची हिंदी चित्रपटसृष्टीची सर्वश्रेष्ठ गायिका, मलिका-ए-तरन्नुम नूरजहाँ, मुंबईत जवळपास ३५ वर्षानंतर (म्हणजे १९४७ नंतर प्रथमच) आली होती. त्यामुळे तिचा चिरतरुण, गोड आवाज ऐकण्याची आणि तिला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा सर्व रसिकांना होती. सिद्धार्थ काक यांनी त्यावेळी हयात असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील काही नामवंत संगीतकार आणि गायकांना आमंत्रण दिले होते, त्याचबरोबर नव्या दमाचे गायकही होते. रंगमंचावर स्वतः दिलीपकुमार हजर होते त्यांची जिवलग मैत्रीण आणि एकेकाळच्या नायिकेचे स्वागत करायला. शबाना आझमी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होत्या. अनिल बिस्वास, नौशाद, हेमंत कुमार यांच्यासारखे प्रतिभावान संगीतकार समोर होते. १९४०-५० च्या दशकातील प्रख्यात गायक सुरेंद्र, G. M.दुर्राणी, राजकुमारी, मीना कपूर, जगजीत कौर, उषा मंगेशकर, तलत महमूद, महेंद्र कपूर, अशोक कुमार होते. आणि हो! प्रत्यक्ष नूरजहाँ तिच्या अत्यंत लाडक्या मैत्रिणीबरोबर म्हणजे लता मंगेशकर बरोबर हजर होती!!

१९३९ ते १९४८ जवळपास १० वर्षांचा काळ नूरजहाँ हिंदी चित्रपटसृष्टीची अनभिषिक्त गानसम्राज्ञी होती. ती पाकिस्तानात निघून गेल्यावर मात्र ते पद फक्त आणि फक्त लताचे होते. आणि आज नूरजहाँ परत आली होती आपल्या जादुई आवाजाची भुरळ रसिकांना घालायला. त्यामुळे लतापुढे स्वतःचे सामर्थ्य दाखवण्याचे, नूरजहाँ नंतर लताच का गानसम्राज्ञी बनली ते दाखवून देण्याचे एक प्रकारे मोठे आव्हानच होते. शिवाय लताला नूरजहाँच्या आधी गायचे होते, त्यामुळे काम एकूणच खूप अवघड होते. 

पूर्ण विचारांती लताने गाण्यासाठी निवडले होते ते होते पं. शामसुंदर यांनी संगीतबद्ध केलेले "बाज़ार" या १९४९ सालच्या चित्रपटातील "साजन की गलियाँ छोड़ चले" हे अजरामर गीत! पहाड़ी रागात बांधलेलं पंजाबी ढंगातील हे गाणे लताने तिच्या उमेदवारीच्या काळात नूरजहाँच्या प्रभावाखाली असताना गायलेलं होतं, आणि त्या प्रभावातून बाहेर येऊन जवळपास ३ दशके लोटल्यानंतर आज ती तेच गाणे त्याच नूरजहाँसमोर गात होती! कल्पना करा, काय प्रसंग असेल! 

लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की अशा भावपूर्ण पण आव्हानात्मक प्रसंगात लताने निवड केली ती श्यामसुंदर यांच्या गाण्याची. ही आहे शामसुंदर यांच्या प्रतिभेची जादू, एका महान गायिकेने एका महान संगीतकाराला दिलेली दाद.

लाहोरमध्ये जन्मलेल्या शामसुंदर यांना तरुणपणी मास्टर गुलाम हैदर यांचे संगीत अतिशय आवडायचे. ते स्वतः उत्तम व्हायोलिन वादक होते. उस्ताद झंडे खान यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये शामसुंदर मुख्य व्हायोलिन वादक होते. नंतर ते काही काळ मास्टर गुलाम हैदर यांचे सहाय्यक होते. मास्टरजींच्या व्यग्रतेमुळे शामसुंदर यांना काही पंजाबी चित्रपटांना संगीत द्यायची संधी मिळाली. "सोहनी कुमारन" (१९३९), "लैला मजनू" आणि "जग्गा डाकू" (१९४०) आणि "गुल बलोच" (१९४२) या पंजाबी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले व सर्व चित्रपटातील गाणी लोकप्रिय झाली. 

१९३८ साली शामसुंदर सुप्रसिद्ध गायक कुंदनलाल सैगल यांच्याबरोबर लाहोरला एका संगीत कार्यक्रमासाठी गेले होते. त्या कार्यक्रमात वीज गेल्याने सैगल यांनी आपले गाणे थांबवले. संयोजकांनी एका तरुण मुलाला बोलावून माइकविना गाण्यास सांगितले. त्या तरुण मुलाने आपल्या आवाजाने श्रोत्यांवर अशी काही जादू केली की श्रोते शांत झाले. कार्यक्रम संपल्यावर सैगल साहेब व शामसुंदर दोघांनी त्या तरुण मुलाचे खूप कौतुक केले. त्याचे नाव होते मोहम्मद रफी! शामसुंदर मोहम्मद रफींच्या गाण्याने एवढे प्रभावित झाले होते की त्यांनी १९४२ साली आलेल्या "गुल बलोच" या पंजाबी चित्रपटात रफींना प्रथम गाण्याची संधी दिली. 

शामसुंदर यांचा पहिला हिंदी चित्रपट होता १९४३ साली प्रदर्शित झालेला प्रभात फिल्म कंपनीचा "नई कहानी". त्यातील "नींद हमारी ख्वाब तुम्हारे" हे G. M. दुर्राणी यांनी गायलेले गीत प्रचंड गाजले होते. त्यानंतर १९४५ साली आलेल्या "गाँव की गोरी (Village Girl)" या चित्रपटात नूरजहाँ यांनी प्रथमच श्यामसुंदर यांच्याबरोबर काम केले. या चित्रपटात एकूण ११ गाणी होती, त्यातील ६ गाणी नूरजहाँ यांनी सोलो गायली होती! सर्व गाणी प्रचंड गाजली. विशेषतः नूरजहाँ यांचे "किस तरह भूलेगा दिल" आणि "बैठी हूँ तेरी याद का लेकर के सहारा" ही २ गाणी नूरजहाँ यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गाण्यांमधली समजली जातात. याच चित्रपटातील "अजी दिल हो काबू में तो" हे G. M. दुर्राणी यांच्याबरोबर मोहम्मद रफी यांनी गायलेले गाणे रफी साहेबांचे हिंदीतील पहिले गाणे समजले जाते.

श्यामसुंदर यांनी १९४६ सालच्या "देव कन्या" या चित्रपटात "पिया मिलन को जानेवाले संभल संभल कर चल" या गाण्यात अमीरबाई कर्नाटकी यांना यमन कल्याण, शिवरंजनी, बहार आणि आसावरी रागात बांधलेले एक सुंदर गीत दिले.

१९४८ सालातील "Actress" हा आणखी एक शामसुंदर यांच्या संगीताने गाजलेला चित्रपट. यातील मोहम्मद रफी यांनी गायलेले "हम अपने दिल का फसाना उन्हे सुना ना सके" आणि "ऐ दिल मेरी आहों में इतना तो असर आए" ही दोन गीते आजही रसिकांच्या लक्षात आहेत.

"भाई जान" (१९४५), "गाँव की गोरी (Village Girl)" (१९४५) आणि "Actress" (१९४८) या तीन चित्रपटांमुळे श्यामसुंदर यांना अफाट लोकप्रियता लाभली. पण त्यांचे सर्वोत्कृष्ट संगीत अजून येणे बाकी होते.

१९४९ हे वर्ष श्यामसुंदर यांच्या कारकिर्दीतील सोनेरी वर्ष म्हटले पाहिजे. या वर्षात त्यांनी "बाजार", "चार दिन" आणि "लाहोर" हे तीन चित्रपट संगीतबद्ध केले. या तिन्ही चित्रपटात मिळून श्यामसुंदर यांनी एकूण ३१ गाणी स्वरबद्ध केली. सर्वच्या सर्व गाणी जबरदस्त लोकप्रिय ठरली. "चार दिन" चित्रपटातील सुरैय्याने गायलेली "इक बेवफा की याद ने तडपाके मार डाला", "अंजामे मोहब्बत कुछ भी नहीं " ही दोन गीते तिची सर्वोत्कृष्ट गीते म्हणून ओळखली जातात. ३१ पैकी १३ गाणी एकट्या लताने गायली होती, त्यातील ७ गाणी सोलो होती. "बाजार" आणि "लाहोर" मधल्या लताच्या गाण्यांवर नूरजहाँचा प्रभाव दिसतो. उदा. "ऐ दिल उनको याद ना करना", "बसा लो अपनी निगाहों में" (बाजार), "टूटे हुए अरमानों की इक दुनिया बसाए" आणि "उस दिल की किस्मत क्या कहिए" मोहम्मद रफी आणि सुरैया यांनी प्रत्येकी ४ सोलो गाणी गायली होती. सर्वच गाणी अतिशय सुमधुर आहेत.

याच सुमारास शामसुंदर यांचे दारूचे व्यसन वाढले. या कारणास्तव लता मंगेशकर त्यांच्याकडे १-२ वर्ष गायल्या नव्हत्या. त्यामुळे १९५१ मध्ये प्रदर्शित झालेल्या "ढोलक" आणि "काले बादल" या दोन चित्रपटात श्यामसुंदर यांनी सुलोचना कदम (चव्हाण) आणि पुष्पा हंस या नवीन गायिकांना संधी दिली आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले. यातील एकूण १८ गाण्यांपैकी तब्बल ९ गाणी सुलोचनाबाईंनी गायली होती, त्यातील ७ सोलो! सुलोचनाबाईंच्या कारकिर्दीतील "ढोलक" हा चित्रपट मानाचा तुरा समजला जातो. "ढोलक" हा चित्रपट पंजाबी शैलीतील संगीताचा एक उत्कृष्ट नमूना समजला जातो.

त्यानंतर १९५३ साली आलेला "अलिफ़-लैला" हा चित्रपट श्यामसुंदर यांचा शेवटचा चित्रपट ठरला. यातील "बहार आयी खिली कलियाँ" हे लताचे सोलो गाणी आणि "क्या रात सुहानी है" हे रफी साहेबांबरोबरचे द्वंद्वगीत खूप गाजले. याच चित्रपटातील "मेरे नगमों में उन मस्ताना" हे तलत महमूद यांनी गायलेले गीत त्यांच्या उत्कृष्ट गाण्यांपैकी एक ठरावे. 

"अलिफ़-लैला" मधील गाणी रेकॉर्ड होत असतानाच शामसुंदर यांचे दुःखद निधन झाले. दारूच्या व्यसनामुळे आणखीन एका गुणवान कलावंताचा दुर्दैवी आणि अकाली अंत झाला. असं म्हणतात की त्यांच्या मृत्यूनंतर "आलिफ-लैला" चित्रपटातील उर्वरित गाणी त्यांचा अतिशय जवळचा मित्र संगीतकार मदन मोहन यांनी पूर्ण केली. पण ती गाणी कोणती हे कळायला मार्ग नाही. असो.

आपल्या अवघ्या १४ वर्षांच्या संगीतकार म्हणून कारकिर्दीत शामसुंदर यांनी एकूण ४ पंजाबी आणि १७ हिंदी चित्रपटांना संगीत दिले. १७ हिंदी चित्रपटात एकूण १४७ गाण्यांना संगीत दिले. १९४९, १९५० आणि १९५१ या ३ वर्षात शामसुंदर यांनी ७८ गाण्यांना संगीत दिले, म्हणजे ५३% गाणी अवघ्या ३ वर्षात! १४७ पैकी १०६ गाणी (७२%) ही शमशाद बेगम, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, सुरैय्या, नूरजहाँ आणि सुलोचना कदम या गायक-गायिकांनी गायली आहेत. "गाँव की गोरी (Village Girl)", "लाहोर", "बाजार", "ढोलक" यांसारख्या चित्रपटातील गाण्यांमुळे ते आपल्या कायम स्मरणात राहतील.

शामसुंदर यांची काही उत्कृष्ट गाणी:

१) किस तरह भूलेगा दिल उनका ख़याल आया हुआ - गाँव की गोरी (Village Girl) (१९४५) - गायिका नूरजहाँ - गीतकार वली साहेब     MUST WATCH

२) अजी दिल हो काबू में तो - गाँव की गोरी (Village Girl) (१९४५) - गायक G. M. दुर्राणी आणि मोहम्मद रफी - गीतकार वली साहेब

३) मस्ती का समां - एक रोज़ (१९४७) - गायिका मुनव्वर सुलताना - गीतकार सरशर सैलानी 

४) ज़रा सुन लो हम अपने प्यार का अफसाना कहते हैं - बाज़ार (१९४९) - गायिका शमशाद बेग़म आणि लता मंगेशकर - गीतकार क़मर जलालाबादी 

५) अंजामे मोहब्बत कुछ भी नहीं - चार दिन (१९४९) - गायिका सुरैय्या - गीतकार शकील बदायुनी

६) टूटे हुए अरमानों की इक दुनिया बसाए - लाहौर (१९४९) - गायिका लता मंगेशकर - गीतकार राजेंद्र कृष्ण   MUST WATCH

७) ठंडी हवा के झोकें - भाई-बहन (१९५०) - गायिका शमशाद बेग़म - गीतकार ईश्वरचंद्र कपूर 

८) मौसम आया है रंगीन - ढोलक (१९५१) - गायिका सुलोचना कदम, गायक सतीश बत्रा - गीतकार अज़ीज़ कश्मीरी    MUST WATCH

९) छलक रहा है निग़ाहोंसे प्यार थोडासा - ढोलक (१९५१) - गायिका सुलोचना कदम - गीतकार अज़ीज़ कश्मीरी   MUST WATCH

१०) मेरे नग्मों में उन मस्ताना - अलिफ़-लैला (१९५३) - गायक तलत महमूद - गीतकार साहिर लुधियानवी 

११) बहार आयी खिली कलियाँ - अलिफ़-लैला (१९५३) - गायिका लता मंगेशकर - गीतकार साहिर लुधियानवी     MUST WATCH


आज शामसुंदर यांची ४ सर्वोत्कृष्ट गीते खाली सादर करत आहे. या गीतांशिवाय शामसुंदर यांच्या कारकिर्दीचे विश्लेषण अपूर्ण राहील. सर्व गाणी MUST WATCH 

१) बैठी हूँ तेरी याद का लेकरके सहारा - गाँव की गोरी (Village Girl) (१९४५) - गायिका नूरजहाँ - गीतकार वली साहेब

या चित्रपटात नूरजहाँ प्रमुख भूमिकेत होती. तिचा नायक होता प्रेम अदिब. या गाण्यात व्हायोलिन चे अप्रतिम वादन आहे. त्याच्या तोडीस तोड नूरजहाँने गायले आहे. तिने घेतलेल्या हरकती/मुरकती लाजवाब आहेत. हे गाणे वेगवान आहे आणि योग्य तालवाद्यांमुळे त्या वेगात एक सातत्य आहे. "अख्सर मेरी आँखों ने तुझे नींद में, हाए तुझे नींद में ढूँढा" यातील "नींद" आणि "हाए" या दोन शब्दांच्या फेकीतून नूरजहाँने दर्द किती प्रभावीपणे पोचवलाय! संपूर्ण गाणे तिने एका जागी बसून गायलंय, शिवाय कपडेही पूर्ण साधे आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष गाण्यावर केंद्रित होते. नूरजहाँचा दर्दभरा, काळीज कापत जाणारा आवाज आपल्याला ओढून घेतो.


२) हम अपने दिल का फसाना उन्हे सुना ना सके - Actress (१९४८) - गायक मोहम्मद रफी - गीतकार नक्शाब 

रफी साहेबांनी गायलेलं एक उत्कृष्ट गीत. शामसुंदर यांच्या संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे गाण्यातील पार्श्वसंगीत कधीही गायक/गायिकेच्या आवाजावर मात करत नाही, उलट ते पूरक ठरतं. हे गीत पडद्यावर प्रेम अदिब यांच्यावर चित्रित झालं आहे.


३) साजन की गलियाँ छोड़ चले - बाज़ार (१९४९) - गायिका लता मंगेशकर - गीतकार क़मर जलालाबादी 

लताची सर्वोत्कृष्ट २० गाण्यांची यादी या गाण्याशिवाय अपूर्ण ठरेल. लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेले हेच ते प्रसिद्ध गाणे. निगार सुल्तानावर चित्रित झालेलं. यात व्हायोलिन, बासरी आणि तबला ऐकू येतो. तबल्याचा ठेका आणि गायनाची लय यांचा सुरेख संगम झाला आहे. लताच्या छोट्या छोट्या हरकती, शब्दफेक वाखाणण्याजोगी. हे गाणं नक्की बघा.


४) बहारें फिर भी आएंगी मगर - लाहौर (१९४९) - गायिका लता मंगेशकर - गीतकार राजेंद्र कृष्ण 

ज्या गाण्याशिवाय शामसुंदरची कहाणी पूर्ण होत नाही असं हे आणखी एक गाणं. कुठल्याही ठेक्याशिवाय "नज़र से दूर जानेवाले दिल से दूर ना करना" या शब्दांनीच आपल्या काळजाचा ठाव घेत हे गाणे सुरु होते. "बहारें फिर भी आएंगी" या ओळीपासून ठेका सुरु होतो. यासाठी बहुदा मटक्याचा वापर केला असावा. लताचा तरुण, आर्ततापूर्ण आवाज त्या नायिकेची व्यथा आपल्यापर्यंत काही सेकंदात पोचवतो. अप्रतिम संगीत रचना आणि तितकेच ताकदवान, भावपूर्ण गायन. वाहवा! असे शब्द आपल्या तोंडून नकळत बाहेर पडतात. 


शामसुंदर यांच्या कलाप्रतिभेस सलाम. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते जरूर कळवा. धन्यवाद.

संदर्भ:

१) सर्व फोटो YouTube वरून साभार 

२) https://apnaarchive.wordpress.com/2012/10/29/shyam-sundar-a-genius-composer/

३) https://www.millenniumpost.in/sundaypost/inland/a-vintage-affair-with-shyam-sundar-369359

४) https://www.songsofyore.com/best-songs-of-shyam-sundar/

=========================================

Friends,

The musical evening of 11th February 1982 proved to be an immemorable one for the Hindi film industry and its fans. What was so special about it? Well, Hindi film industry had completed 50 years since the first movie "Alam Ara" was released which had the sound on the screen for the first time. To celebrate this milestone, Cinema Vision India (owned by famous narrator Siddharth Kak) along with Music Directors Association had organized a special programme at Shanmukhanand Hall in the then Bombay viz. "Mortal Men Immortal Melodies". The program also had another reason to be organized.

Noorjehan and Dilip Kumar
The erstwhile Queen of the Hindi film industry Malika-E-Tarannum Noorjehan was visiting Bombay for the first time after the partition. Hence fans were more than eager to see her and listen to her evergreen melodious voice. The organizers had invited many stars of the Hindi cinema. The Tragedy King Dilip Kumar was present on stage to welcome his close friend Noorjehan. Shabana Azmi was compering the entire show. The legendary music composers, the doyens of the Hindi film music such as Anil Biswas, Naushad, Hemant Kumar were present. Many singers from the 1940s, 50s and 60s such as G. M. Durrani, Surendra, Rajkumari, Meena Kapur, Jagjit Kaur, Usha Mangeshkar, Talat Mahmood Mahendra Kapoor and Ashok Kumar were also gracing the occasion. To top it all, Lata Mangeshkar herself was waiting to greet and meet her close friend Noorjehan after about 35 years.

Noorjehan ruled the Hindi film industry between 1939 and 1948 through her melodious songs. After she left India to settle down in Pakistan, Lata undoubtedly was the Queen. But, today the Malika-E-Tarannum was back to enthrall the audience with her sweet voice. And thus posed the challenge in front of Lata to prove why she ruled after Noorjehan. Lata was scheduled to sing before Noorjehan, hence it was more challenging.

And which song did Lata choose to prove her mettle? It was none other than "Sajan Ki Galiyan Chhod Chale" from the 1949 film "Bazar" composed by the one and only Shyam Sundar! Composed in Raag Pahadi and in Punjabi style, Lata had recorded this song in 1948/49 while being under the influence of Noorjehan. And today, after almost 3 decades, she was going to sing the same song, now in her own style, in front of her idol - Noorjehan! What a moment it must have been.

This was the perfect appreciation for the musical genius of Shyam Sundar by the equally genius the great Lata Mangeshkar!

Shyam Sundar was born in Lahore and since his childhood was fan of Master Ghulam Haider's compositions. Shyam Sundar was a good Violin player and used to be the lead performer in the orchestra run by Ustad Jhande Khan. He assisted Master Ghulam Haider for a while. He got an opportunity to compose for few Punjabi films since Master ji was extremely occupied with his work. He composed music for 4 Punjabi films viz. "Sohni Kumaran" (1939), "Laila Majnu" and "Jagga Daku" (1940) and "Gul Baloch" (1942). Songs from all the 4 films became popular.

In 1938, Shyam Sundar accompanied the legendary singer from those times Kundan Lal Saigal to Lahore for a concert. Due to the power failure, Saigal saab had to stop his performance. The organizers called in a young boy from the audience to engage the audience till the power is back. The young boy played magic on the audience with his vibrant voice. Both Saigal saab and Shyam Sundar praised the young boy. He was none other than Mohammad Rafi who himself became a legend in the later years! Shyam Sundar was so impressed with Rafi's voice that he gave him his first break in the films in the film "Gul Baloch" (1942).

Shyam Sundar's first Hindi film was "Nai Kahani" (1943) produced by Prabhat Film Company. G. M. Durrani sang "Neend Hamari Khwab Tumhare" which became an instant hit. 

1945 saw Noorjehan singing for the first time for Shyam Sundar in "Gaaon Ki Gori (Village Girl)". The film had total 11 songs out of which Noorjehan had sung 6 solos. All were extremely popular. In particular, the two songs viz. "Baithi Hoon Teri Yaad Ka" and "Kis Tarah Bhoolega Dil" are considered to be Noorjehan's best songs till date. One of these songs is being presented later in this blog. The film also had "Aji Dil Ho Kaboo Mein" - a duet by G. M. Durrani and Mohammad Rafi. This is supposed to be Rafi's first Hindi song.

Shyam Sundar composed another wonderful song in "Dev Kanya" (1946) viz. "Piya Milan Ko Jaanewale Sambhal Sambhal Kar Chal" sung by Amirbai Karnataki. This song was based on multiple Ragas such as Yaman Kalyan, Shivranjani, Bahar and Asawari.

1948 saw yet another musical hit "Actress" by Shyam Sundar. Mohammad Rafi's two of the memorable songs "Hum Apne Dil Ka Fasana Unhe Suna Na Sake" and "Ai Dil Meri Aahon Mein Itna To Asar Aaye" are remembered till date.

Shyam Sundar's popularity touched the sky high with 3 hit movies viz. "Bhai Jaan" (1945), "Gaaon Ki Gori (Village Girl)" (1945) and "Actress" (1948). He was the most sought after music composer in those days. Sadly, he could not digest the success and got into the habit of drinking liquor.


1949 is supposed to the Golden year in Shyam Sundar's career. He delivered 3 movies "Bazar", "Char Din" and "Lahore" this year. There were 31 songs composed for these 3 movies. All the songs achieved greater success and popularity. "Anjamein Mohabbat Kuchh Bhi Nahin" and "Ik Bewafa Ki Yaad Ne Tadapake Maar Dala" from "Char Din" are 2 of the best songs of Suraiyya. Out of 31 songs, Lata contributed to 13, 7 of which were Solo songs. Lata, in those days, had influence of Noorjehan. It is evident when you hear her songs from "Bazar" and "Lahore". Mohammad Rafi and Suraiyya had sung 4 solos each.

Due to Shyam Sundar's continued addiction towards drinking, Lata had refused to sing for him. Therefore, for 2 movies released in 1951 viz. "Dholak" and "Kaale Badal", he had roped in new singers in the form of Sulochana Kadam (mostly known as Sulochana Chavan) and Pushpa Hans. "Dholak" turned out to be the biggest hit in Sulochana Kadam's career. She sang 9 out of 18 songs composed for both the movies, out of which 7 solos. And all were wonderfully melodious songs.

"Alif Laila" released in 1953 proved to be the last movie for Shyam Sundar. "Bahar Aayi Khili Kaliyan" by Lata and "Kya Raat Suhani Hai" by Lata and Rafi were popular gems. The song "Mere Nagmon Mein Un Mastana" by Talat Mehmood is considered to be one of his best songs.

Shyam Sundar died a tragic death during the making of "Alif Laila". His close friend and equally talented composer Madan Mohan completed rest of the songs. However, it is not known till date which songs were composed by whom.

In a career spanning 14 years from 1939 to 1953, Shyam Sundar gave music to 4 Punjabi and 17 Hindi films. He composed approx. 147 songs in 17 Hindi films. In 3 years i.e. from 1949 to 1951, he composed 78 songs, that is around 53% of his total songs! 106 out of 147 (72%) songs were contributed by just 6 singers - Shamshad Begum, Noorjehan, Lata Mangeshkar, Mohammad Rafi, Suraiyya and Sulochana Kadam.

We will always remember Shyam Sundar through his beautiful compositions from the films "Gaaon Ki Gori (Village Girl)", "Lahore", "Bazar" and "Dholak".

Some of the Besties by Shyam Sundar:

१) Kis Tarah Bhoolega Dil Unka Khayal Aaya Hua - Gaaon Ki Gori (Village Girl) (1945) - Noorjehan - Lyricist Wali Sahab     MUST WATCH

२) Aji Dil Ho Kaboo Mein To - Gaaon Ki Gori (Village Girl) (1945) - G. M. Durrani and Mohammad Rafi - Lyricist Wali Sahab

३) Masti Ka Samaa - Ek Roj (1947) - Munawwar Sultana - Lyricist Sarshar Sailani 

४) Jara Sun Lo Hum Apne Pyar Ka Afsana Kehte Hai - Bazar (1949) - Shamshad Begum and Lata Mangeshkar - Lyricist Qamar Jalalabadi 

५) Anjaame Mohabbat Kuchh Bhi Nahin - Char Din (1949) - Suraiyya - Lyricist Shakeel Badayuni

६) Toote Hue Armanon Ki Ik Duniya Basayein - Lahore (1949) - Lata Mangeshkar - Lyricist Rajendra Krishna   MUST WATCH

७) Thandi Hawa Ke Jhokein - Bhai Behan (1950) - Shamshad Begum - Lyricist Ishwar Chandra Kapoor 

८) Mausam Aaya Hai Rangeen - Dholak (1951) - Sulochana Kadam and Satish Batra - Lyricist Aziz Kashmiri    MUST WATCH

९) Chhalak Raha Nigahon Se Pyar Thodasa - Dholak (1951) - Sulochana Kadam - Lyricist Aziz Kashmiri   MUST WATCH

१०) Mere Nagmon Mein Un Mastana - Alif-Laila (1953) - Talat Mehmood - Lyricist Sahir Ludhiyanvi 

११) Bahar Aayi Khili Kaliyan - Alif-Laila (1953) - Lata Mangeshkar - Lyricist Sahir Ludhiyanvi   MUST WATCH


Presenting below are 4 of Shyam Sundar's best compositions. All songs are MUST WATCH.

1) Baithi Hoon Teri Yaad Ka Lekar Ke Sahara - Gaaon Ki Gori (Village Girl) (1945) - Noorjehan - Lyricist Wali Sahab

Noorjehan played the female lead role in this film. The male lead role was played by Prem Adeeb. The composition has Violin as a major instrument. Noorjehan's Gaayaki is difficult to explain in words. The song has a certain pace and accompanying instruments only add to its beauty. Listen to the Noorjehan's voice throw on the words "Neend" and "Haaye" in "Akhsar Meri Aankhon Ne Tuze Neend Mein, Haaye Tuze Neend Mein Dhoondha" line. Noorjehan's young, sharp voice projects the character's agony so effectively! Enjoy the song.


2) Hum Apne Dil Ka Fasana Unhe Suna Na Sake - Actress (1948) - Mohammad Rafi - Lyricist Naqshab

One of the best Rafi songs ever. Shyam Sundar's arrangement of accompanying instruments never overpower the singer's voice or the lyrics itself. 


3) Sajan Ki Galiyan Chhod Chale - Bazar (1949) - Lata Mangeshkar - Lyricist Qamar Jalalabadi

List of Lata's Top 20 songs would be incomplete without this song. Picturized on Nigar Sultana, this song has Violin, Flute and Tabla throughout. The singing is synchronized with the Tabla's Theka. Lata's Harkati/Murkati are worth listening.


4) Baharein Phir Bhi Aayengi - Lahore (1949) - Lata Mangeshkar - Lyricist Rajendra Krishna

One cannot talk about Shyam Sundar's career without mentioning this particular song. One can easily say that this song is the signature song of Shyam Sundar. The start without accompaniment itself captures audiences' attention. Just out of the world composition and equally outstanding Gayaki by Lata. Hats off to both for giving us this gem of a song!


Hope you would have liked the blog. Would welcome your comment. Thank you.

References:

1) All images courtesy YouTube

2) https://apnaarchive.wordpress.com/2012/10/29/shyam-sundar-a-genius-composer/

3) https://www.millenniumpost.in/sundaypost/inland/a-vintage-affair-with-shyam-sundar-369359

4) https://www.songsofyore.com/best-songs-of-shyam-sundar/