Namaskar. Thanks for being here. English version follows Marathi version below.
Photo Courtesy Wikipedia
मी मागे म्हटलं होतं तसं काही चित्रपट हे त्यातील गाण्यांमुळेच अधिक लक्षात राहतात. १९६८ साली आलेला "किस्मत" हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा दिग्दर्शक म्हणून हा पाचवा चित्रपट तर नायिका बबिता हिचा हा केवळ चौथा चित्रपट! त्यातल्या त्यात अनुभवी होता तो चित्रपटाचा नायक विश्वजित. चित्रपटाची कथा सुमार आणि अभिनय टुकार; असे असताना या चित्रपटाचं बलस्थान ठरलं ते ओ. पी. नय्यर यांनी दिलेले संगीत! चित्रपटात एकूण ५ गाणी; त्यातील "कजरा मोहब्बतवाला" हे गाणं तुफान गाजलं आणि आजही गाजतंय. याबरोबरच महेंद्र कपूर यांनी गायलेली "लाखों है यहाँ दिलवाले" आणि "आँखों में क़यामत के काजल" ही दोनही गाणी लोकप्रिय झाली. पण आशा भोसले यांनी गायलेले "आओ हुज़ूर तुमको सितारों में ले चलूँ" हे गाणे आजही त्यांच्या सर्वोत्तम १० गाण्यांमध्ये गणले जाते.
ओ. पी. नय्यर १९५०-६० च्या दशकातले महत्वाचे आणि गाजलेले संगीतकार. १९५७ सालच्या "नया दौर" मुळे त्यांची आणि आशाजींची जोडी खऱ्या अर्थाने नावारूपाला आली. या जोडीने अनेक भन्नाट गाणी दिली आहेत उदा. "माँगके साथ तुम्हारा" (नया दौर - १९५७), "आइयें मेहरबाँ" (हावड़ा ब्रिज १९५८), "यह रेशमी ज़ुल्फ़ों का अँधेरा" आणि "जाईयें आप कहाँ जाएँगे" (मेरे सनम १९६५). १९६८ सालातील "किस्मत" हा ओ. पी. नय्यर आणि आशाजी यांच्या शेवटच्या काही चित्रपटांपैकी एक.
नायक विकी (विश्वजित) हा एक क्लबमध्ये गाणारा कलाकार असतो. योगायोगाने त्याची गाठ रोमाशी (बबिता) पडते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. एक दिवस रोमा विकीला नॅन्सी (हेलन) बरोबर बघते आणि तिचा गैरसमज होतो त्यामुळे ती दुःखी होऊन, दारू पिऊन पार्टीत गाणे म्हणते ते आज सादर करत असलेले गाणे "आओ हुज़ूर तुमको सितारों में ले चलूँ". कवी नूर देवासी यांचे शब्द आहेत.
प्रेमभंग झाल्यावर "आपण इतके वेडे कसे झालो होतो?" असा प्रश्न पडून नायिका स्वतःवरच चिडून उपरोधिक हसते आहे हे लक्षात घेऊन गाण्याची दमदार सुरुवात आशाजी करतात. हिंदीमध्ये फार थोडी गाणी ही हसण्याने सुरु झाली आहेत त्यातील हे एक. आणि मग सुरु होते १२ ओळींची छोटीशी बंदिश. "आरंभ-स्वर" च्या संकल्पनेत इतका मोठ्ठा आरंभ असलेले आजपर्यंतचे हे एकमेव गाणे आहे.
हम से रौशन हैं चाँद और तारे, हम को दामन समझिये ग़ैरत का
उठ गये हम गर ज़माने से, नाम मिट जायेगा मुहब्बत का
दिल है नाज़ुक कली से फूलों से, यह न टूटे ख़याल रखियेगा
और अगर आप से यह टूट गया, जान-ए-जां इतना ही समझियेगा ।।
क्या?
फिर कोई बाँवरी मुहब्बत की, अपनी ज़ुल्फ़ें नहीं सँवारेगी
आरती फिर किसी कन्हैया की, कोई राधा नहीं उतारेगी ।।
यात अनेक ठिकाणी आशाजींनी अतिशय सुंदर अशा हरकती / मुरक्या घेतल्या आहेत त्या लक्ष देऊन ऐका उदा. "दामन ", "ग़ैरत", "नाजूक", "फुलों से" . पहिल्या ८ ओळींमध्ये नायिकेचा स्वाभिमान दिसतो तर "क्या?" या प्रश्नानंतर येणाऱ्या ४ ओळींमधून हळवेपणा. "फिर कोई बाँवरी मुहब्बत की" पासून गाण्याचा रंग आणि राग दोन्ही बदलतात. शब्दांच्या पाठीमागून गिटार/मेंडोलिन यांचे सतत वाजणारे स्वर नायिकेच्या मनातील आंदोलने व्यतीत करतात. तसेच "आरती फिर किसी कन्हैया की" या ओळीच्या पाठीमागे बासरीचे स्वर ऐकू येतात, हे विचार संगीतकार ओ. पी. नय्यर यांचे. अशा संगीत, शब्द आणि गायन यांच्या मिलाफातून एक सुंदर मैफल सुरु होते. यानंतर कानावर पडते ती गिटार आणि तालवाद्यांची जादू, आणि खरंच आपण कधी डोलायला लागतो ते आपले आपल्यालाच समजत नाही.
आओ हुज़ूर तुमको, सितारों में ले चलूँ
दिल झूम जाए ऐसी, बहारों में ले चलूँ
आओ हुज़ूर आओ ...।।
दोन्ही कडव्यांतील संगीत रचनाही अफलातून आहे. सॅक्सोफोन जबरदस्त वाजलाय. दोन ओळींनंतर आशाबाईंनी आ हा हा ओ हो हो गाताना केवळ कमाल केली आहे! आणि काय ती हुकमी उचकी!! लाजवाब.
हमराज़ हमख़याल तो हो, हमनज़र बनो तय होगा ज़िंदगी का सफ़र, हमसफ़र बनो चाहत के उजले-उजले नज़ारों में ले चलूँ दिल झूम जाए ऐसी, बहारों में ले चलूँ आओ हुज़ूर तुमको ...।।
लिख दो किताब-ए-दिल पे कोई, ऐसी दास्तां जिसकी मिसाल दे न सके, सातों आसमां बाहों में बाहें डाले, हज़ारों में ले चलूँ दिल झूम जाये ऐसी, बहारों में ले चलूँ आओ हुज़ूर तुमको ...।।
दारू न पिता केवळ शब्दोच्चार आणि गायनातून दारू प्यायल्याचे भासवणे फक्त महान गायक/गायिकाच करू जाणे. बाई ग्रेट का आहेत हे समजते. दुर्दैवाने बबिताचा अभिनय इतका सुमार आहे की तो आशाबाईंच्या जबरदस्त गाण्याला न्याय देत नाही.
सोशल मीडियावर हे गाणे अनेक गायिकांनी गायचा प्रयत्न केला आहे. त्यातील सर्वोत्कृष्ट सादरीकरण आजची एक आघाडीची गायिका मधुरा दातार हिने एका कार्यक्रमात केले आहे. तेही सोबत audio स्वरूपात देत आहे म्हणजे दोन्हीतील साम्य आणि फरक लक्षात येईल. मूळ गाण्यातील अनेक जागा मधुराने हुबेहूब घेतल्या आहेत. अप्रतिम ठेहराव आणि समरसून गायल्याबद्दल तिचे खूप कौतुक. फक्त लता-आशा यांची शारीरिक ताकद आणि ती गाण्यात Throw च्या रूपात परावर्तित करण्याचे त्यांचे सामर्थ्य हे दुसरे कोणी करू शकत नाही याची पुन्हा एकदा जाणीव होते. असो. तर ऐका ओ.पी.-आशा जोडीचे हे अफलातून, लाजवाब गाणे.
तुमच्या प्रतिक्रिया कळवा, आवडले तर तुमच्या संपर्कात शेअर करा. धन्यवाद.
Namaskar. Thanks for being here. English version follows Marathi version below.
एक वो ज़माना था ...
जेंव्हा नायिकेला खुश करण्याकरता नायकाने एखादे छानसे गाणे तिच्याकडे प्रेमाने बघत, शांतपणे कुठलेही हातवारे किंवा बीभत्स नाच न करता म्हटले तरी ती बिचारी खुश व्हायची.
और एक ये ज़माना है ...
जेंव्हा विचित्र अंगविक्षेप, बीभत्स नाच, आजूबाजूला नाच्यांची गर्दी, आणि कंठकल्लोळ करणारे संगीत याशिवाय नायक-नायिकेचं गाणंच होत नाही
मी गोष्ट करतोय १९५०-६० च्या दशकाची जेंव्हा मुलायम, हळुवार संगीतही ऐकवलं जायचं चित्रपटातून. आणि लोकं सुद्धा अशी गाणी डोक्यावर घ्यायची! आज सादर करत असलेले गीतही असेच एक रोमँटिक गाणे आहे.
१९५० साली आलेला M. Sadiq यांनी दिग्दर्शित केलेला "अनमोल रतन" हा चित्रपट अत्यंत टुकार चित्रपटात गणला गेला. त्यात काहीच "अनमोल" वाटले नाही लोकांना. दिग्दर्शक Sadiq आणि लेखक दीनानाथ (D.N.) मधोक यांनी असला भिकार चित्रपट काढून आम्हा रसिकांचा एक प्रकारे अपमानच केला आहे अशी टीका रसिकांनी केली होती. त्यामुळे हा चित्रपट लोकं कधीच विसरले. पण आजतागायत रसिकांच्या लक्षात राहिली ती या चित्रपटातील नितांतसुंदर गाणी.
गीतकार दीनानाथ (D.N.) मधोक यांनी लिहिलेली आणि संगीतकार विनोद यांनी स्वरबद्ध केलेल्या अप्रतिम गीतांनी आजवर रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. संगीतकार विनोद यांच्यावर मी यापूर्वी सविस्तर लिहीले आहे ते इथे वाचा - अनमोल रतन - 11 : Gifted Musician - "Lara Lappa" Vinod.
"अनमोल रतन" मध्ये एकूण ११ गाणी आहेत. त्यापैकी ७ गाणी (५ सोलो व २ द्वंद्वगीते) लताने गायली आहेत. ३ गाणी (१ सोलो व २ द्वंद्वगीते) तलतने, १ सोलो गाणे आशा भोसले यांनी तर २ सोलो गाणी निर्मलादेवी (अभिनेता गोविंदाच्या आई) यांनी गायली आहेत. लताची सातही गाणी एक-से-एक आहेत. त्यातही "तारें वही है, चाँद वही है, हाये मगर वो रात नहीं" हे सोलो व तलत बरोबर गायलेले "शिकवा तेरा मैं गाउँ" ही दोन्ही गाणी लाजवाब आहेत. जरूर ऐका.
आज सादर करत असलेले गीत हे याच चित्रपटातील तलत महमूद यांनी गायलेले सोलो गीत आहे. चित्रपटाचा Video उपलब्ध नाही त्यामुळे हे गाणे Audio स्वरूपात ऐकावे लागेल.
विनोद यांनी हे गाणे भैरवी रागात बांधलेले आहे. "आरंभ-स्वर" च्या मागील भागातील नौशाद यांचे "टूटे ना दिल टूटे ना" हे गाणेही भैरवीतच बांधलेले होते. पण दोन्ही चालीत बराच फरक आहे. गाणे सुरु होते तलतच्या तब्बल १८ सेकंद घेतलेल्या सुंदर आलापाने. आणि मग येते एका प्रियकराचे मनोगत. आपल्या शांत, हळुवार स्वरांनी तलतने या गाण्याचे सौन्दर्य वाढवले आहे.
पहिला अंतरा हा या गीताचा परमोच्च बिंदू आहे असे मला वाटते. नायक-नायिकेची दृष्टादृष्ट तर झाली पण ठरवून का नकळत हे नायकाला कळत नाहीये. दृष्टादृष्ट झाल्यावर मात्र काय होते याचे सुंदर वर्णन पुढील दोन ओळींमध्ये आले आहे. दोन वेगळी क्रियापदे वापरून दोन्ही ओळींचे अर्थ गीतकार मधोक यांनी आपल्या प्रतिभेने पूर्णपणे वेगळे केले आहेत. समजतात का बघा नाहीतर प्रतिक्रियेमध्ये लिहा, मी उत्तर देईन :-)
मिल गई, आँखों से आँखें
भूल से SS, या जान कर
वो भी शरमाने लगे हाए,
वो भी शरमाने लगे,
और वो भी, शरमाने लगी
जब किसी के रुख़ पे ज़ुल्फें
आ के लहराने लगी
तलतने "भूल से" नंतर घेतलेली सुंदर हरकत ऐका. "शरमाने लगे" नंतरच्या छोट्याशा पॉजने पुढच्या "और वो भी" ची लज्जत वाढवली आहे. तोंडातून "वाह वाह" असे सहज येते.
पहिला अंतरा हा वरच्या पट्टीत असल्याने तलतच्या आवाजात ताण जाणवतो पण येणारा दुसरा अंतरा हा खालच्या स्वरांमध्ये असल्याने ते तलतचे बलस्थान आहे, त्यामुळे त्याचा आवाज या कडव्यात खुलल्याचे जाणवते.
दर्द जो पैदा हुआ है
दिल में दिल कैसे कहे
धड़कनें दिल की कहानी
दिल को समझाने लगी
जब किसी के रुख़ पे ज़ुल्फें
आ के लहराने लगी
परत एकदा मधोक यांनी शब्दातून कमाल केली आहे! "दिल में" नंतरचा पॉज हा "दर्द कहाँ पैदा हुआ है?" या प्रश्नाचे उत्तर देतो. लगेच पुढचा प्रश्न "दिल कैसे कहे?". आणि पुढच्या दोन ओळींत त्याचेही उत्तर गीतकार देऊन टाकतात - "धड़कने दिल की कहानी दिल को समझाने लगी". किती सुंदर कल्पना आहे ही!
अप्रतिम शब्दरचना, त्याला साजेसं संगीत आणि तलतच्या मखमली आवाजातलं हे गाणं आपल्याला निखळ आनंद देऊन जातं. चला, ऐकू या हे गीत.
There was a time...
When, to make
the heroine happy, the hero would simply sing a beautiful song, looking at her
with love, without any gestures or outrageous dance moves — and the poor girl
would still be delighted.
And then there is today’s time...
When a song
between the hero and heroine cannot exist without weird body movements, vulgar
dances, a crowd of background dancers, and blaring, deafening music.
I am talking about the 1950s–60s,
when soft, gentle melodies were presented in films. And people cherished such
songs deeply! The song I am presenting today is one such romantic gem.
In 1950, director M. Sadiq
released the film Anmol Ratan, which was considered a very poor film.
Audiences found nothing “precious” (Anmol) in it. Critics even said that
director Sadiq and writer Dinanath (D.N.) Madhok had insulted music lovers by
making such a bad movie. As a result, people quickly forgot the film. But what
stayed alive in memory were its extraordinarily beautiful songs.
The lyrics were written by D.N.
Madhok, and the music was composed by Vinod. These timeless songs have ruled
the hearts of listeners ever since. I have previously written in detail about
composer Vinod — you can read it here: Anmol Ratan – 11: Gifted Musician –“Lara Lappa” Vinod.
The film Anmol Ratan had
11 songs in total. Out of these:
7 were sung by Lata Mangeshkar (5 solos + 2 duets),
The song I present today is Talat
Mahmood’s solo from this same film. Since the video is not available, you can
only listen to the audio.
Vinod composed this song in Raag
Bhairavi. (In fact, in the previous edition of Aarambh-Swar, Naushad’s “Toote
Na Dil Toote Na” was also based on Bhairavi — though the two tunes are very
different.) The song begins with a beautiful 18-second alaap by Talat.
Then follows the musings of a lover. With his soft, delicate voice, Talat
enhanced the beauty of the composition.
जब किसी के, रुख़ पे ज़ुल्फें
आ के, लहराने लगी
हसरतें उठ उठ के
अरमानों से टकराने लगी
(रुख़ =Face/Cheek, हसरतें = Wishes, अरमान = Dream)
I feel the first verse is the
high point of this song. The hero and heroine exchange glances — but the hero does
not know whether it happened intentionally or by accident. Yet once it happens,
the following lines describe the magic that follows, with two different verbs
giving two subtly different shades of meaning.
मिल गई, आँखों से आँखें
भूल से SS, या जान कर
वो भी शरमाने लगे हाए,
वो भी शरमाने लगे,
और वो भी, शरमाने लगी
जब किसी के रुख़ पे ज़ुल्फें
आ के लहराने लगी
Notice Talat’s beautiful flourish
after the words “Bhool Se”. The small pause after “Sharmane Lage”
enhances the charm of “Aur Woh Bhi”. You cannot help but exclaim Wah Wah!
Because the first verse lies in a
higher pitch, there is some strain in Talat’s voice. But the second verse is in
a lower register — Talat’s strength — and his voice blooms here.
दर्द जो पैदा हुआ है
दिल में दिल कैसे कहे
धड़कनें दिल की कहानी
दिल को समझाने लगी
जब किसी के रुख़ पे ज़ुल्फें
आ के लहराने लगी
Once again, Madhok’s words work
wonders. The pause after “Dil Mein” gives the answer to “Where is the
pain born?” And then comes the next question: “Dil Kaise Kahe?” (How can
the heart say it?). The following two lines resolve it beautifully — “The
heartbeat itself begins to explain the heart’s story to the heart.” What a marvellous
idea!
This song — with exquisite
lyrics, fitting composition, and Talat’s velvety voice — leaves us with pure
joy. Come, let us listen to it.
Namaskar. Thanks for being here. English version follows Marathi version below.
टूटे ना दिल टूटे ना - अंदाज़ (१९४९) - गीतकार मज़रूह सुलतानपुरी - संगीतकार नौशाद - गायक मुकेश चंद माथुर
साल होतं १९४९. या वर्षी तब्बल ११८ हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले होते! (संदर्भ विकिपीडिया) एक-से-एक असे चित्रपट. काही नावेच बघा ना - बरसात, महल, दिल्लगी, शबनम, बडी बहेन, पतंगा, दुलारी, लाहोर, बाज़ार, लाडली इ. यातील अनेक चित्रपट प्रचंड गाजले, कित्येक चित्रपटांची गाणी अजरामर झाली. कित्येक तारे-तारका यांचे नशीब फळफळले.
अशा जबरदस्त सिनेमांच्या भाऊगर्दीत मेहबूब खान या तगड्या दिग्दर्शकाने "अंदाज़" नावाचा चित्रपट प्रदर्शित केला. प्रमुख भूमिकेत होते - दिलीप कुमार, नर्गिस आणि राजकपूर. तिघेही त्याकाळचे सुपरस्टार. पण तिघांनी एकत्र काम केलेला हा एकमेव चित्रपट! गीतकार मज़रूह सुलतानपुरी तर संगीतकार नौशाद. हा चित्रपट हिट न होता तरच नवल. चित्रपटात एकूण १० गाण्यांची जबरदस्त मेजवानी. त्यापैकी लता मंगेशकर आणि मुकेश यांची प्रत्येकी ४ सोलो गाणी. आणि लताची २ द्वंद्वगीते - एक मोहम्मद रफी तर दुसरे शमशाद बेगम यांचेबरोबर.
नौशाद यांनी मुकेशचा आवाज फक्त ३ चित्रपटांतील १० गाण्यांसाठी वापरला - "मेला" (१९४८) (गाये जा गीत मीलन के), "अनोखी अदा" (१९४८) (५ गाणी) आणि "अंदाज़" मध्ये ४ सोलो गाणी. राजकपूर-मुकेश आणि दिलीपकुमार-मोहम्मद रफी या जोड्या ठरून गेलेल्या काळात नौशाद यांनी "अंदाज़" मध्ये दिलीपकुमार साठी मुकेशचा तर राजकपूर साठी रफीचा आवाज वापरण्याचे धाडस केले आणि यशस्वी करून दाखवले!
नैना (नर्गिस) श्रीमंत वडिलांची एकुलती एक मुलगी, लाडाकोडात वाढलेली, घोडेस्वारीचा शौक असलेली. एका अपघातात तिला दिलीप (दिलीप कुमार) वाचवतो. पुढे त्यांची मैत्री होते. कालांतराने दिलीपचे नैनावर प्रेम बसते, पण नैनाला हे माहिती नसते कारण ती मात्र राजनच्या (राज कपूर) आकंठ प्रेमात असते. मधल्या काळात नैनाच्या वडिलांचे निधन होते त्यामुळे ती दुःखात बुडून जाते. राजन परदेशातून परत आल्यावर तिला धीर देतो. त्या दोघांचे आपापसातील वागणे पाहून दिलीपला त्यांच्यातील प्रेमाचा अंदाज येतो, त्याला धक्का बसतो.
गाण्याआधीची तिघांची मनःस्थिती लक्षात घ्यावी लागेल - राजन नुकताच परदेशातून आला आहे, नैनाला भेटून खूप आनंद झालाय त्याला. नैनाने त्याला दिलीप या तिच्या मित्राबद्दल बरेच सांगितले आहे पण तरीही दिलीपला पाहून/भेटून राजन दिलीप-नैना यांच्या नात्याविषयी थोडासा साशंक आहे. नैनाचा आनंद राजनला भेटून गगनात मावत नाहीये. तिला दिलीपच्या तिच्याविषयीच्या भावना माहिती नाहीयेत. आणि दिलीप मात्र राजनच्या येण्याने असुरक्षित झाला आहे, त्याला वाटतंय की राजन नैनाला त्याच्यापासून दूर करणार, नैनाने तिचे प्रेम राजनवर आहे हे न सांगून दिलीपला दुखावले आहे. याच नाजूक क्षणी राजन आणि नैना दिलीपला पियानोवर एक गाणे गायची विनंती करतात. मग सुरु होते मुकेशचे अतीव सुंदर असे गीत.
राजनने दिलीपला एखादे प्रेमाचे गीत गा अशी विनंती केलेली असते; पण तो तर "टूटे ना दिल टूटे ना टूटे ना" गातो त्यामुळे राजन थोडासा अवाक होऊन त्याच्याकडे पाहतो. दिलीपही कसनुसं हसत कधी नैनाकडे तर कधी राजनकडे पाहतो, त्यावेळच्या ओळी ऐकल्या तर लक्षात येईल. नैनाकडे पाहताना "मला का फसवलंस?" असे भाव दिलीपच्या चेहऱ्यावर दिसतात तर राजनकडे पाहताना "तू लुटेरा आहेस" या भावनेने रोखलेली ती नजर एखाद्याचे काळीज चिरत जाईल! दिलीपकुमारचा अभिनय लाजवाब आहे; एरवी तो खूप नौटंकी करतो असे माझे प्रांजळ मत आहे पण या संपूर्ण चित्रपटात त्याचा अभिनय अत्यंत नैसर्गिक आहे. नर्गिस व राजकपूरनेही आपल्या मुद्राभिनयाने तोडीस तोड साथ केली आहे. तिघांच्याही चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासारखे आहेत. तिघांच्याही व्यक्तिरेखा इतक्या ताकदवान आहेत की चित्रपट बघताना आपण खिळून राहतो. कोणाचा अभिनय श्रेष्ठ हे ठरवणे अतिशय अवघड आहे. या सर्वांना नैसर्गिक अभिनय करायला लावण्याचे कसब मात्र दिग्दर्शक मेहबूब खानचे.
गाण्याबद्दल बोलायचे तर नौशादने हे गीत भैरवी रागात बांधले आहे. हे गाणे म्हणजे चित्रपटात पुढे येणाऱ्या प्रसंगांची एक झलकच आहे. मजरुह यांचे शब्द म्हणजे सोने आहे, आणि मुकेशने आपल्या धीरगंभीर आवाजाने त्या व्यक्तिरेखेचे सगळे दुःख गाण्यात ओतले आहे. दिलीपकुमार स्वतः गायक असल्याने त्याने सर्व छोट्या छोट्या हरकती-मुरकती व्यवस्थित घेतल्या आहेत त्यामुळे बहुदा Editor चे काम थोडे कमी झाले असावे. गाण्यामध्ये प्रामुख्याने पियानो, व्हायोलिन, डफ आणि मध्ये बहुदा मेंडोलिनचे तुकडे यातून अप्रतिम चाल निर्माण केली आहे नौशादने. सर्व गाणी अफलातून आहेत. या चित्रपटातील मुकेशची सर्व गाणी ही बहुदा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम १०-२० गाण्यांमध्ये गणना करता येईल इतकी जबरदस्त गायली आहेत. उदा. "झूम झूम के नाचों आज", "तू कहे अगर जीवनभर" आणि "हम आज कहीं दिल खो बैठे".
चला तर ऐकू या हे अप्रतिम गीत. आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आवडले तर पुढे पाठवा. धन्यवाद.
The year was 1949. That
year, a staggering 118 Hindi films were released! (Source: Wikipedia) Many
of them were iconic. Titles like Barsaat, Mahal, Dillagi, Shabnam,
Badi Bahen, Patanga, Dulari, Lahore, Bazaar and
Ladli, etc. made their mark. Several songs from these films have become
timeless classics. The fortunes of many stars soared with these movies.
Amidst this wave of stellar
cinema, Mehboob Khan, a powerful director, released “Andaz”, a
film that stood out not just for its story, but for its historic casting: Dilip
Kumar, Nargis, and Raj Kapoor – the only film they ever did together. The
lyricist was Majrooh Sultanpuri, and the music was composed by Naushad.
The film boasted a feast of 10 incredible songs. Out of these, Lata
Mangeshkar and Mukesh sang 4 solo songs each. Lata also sang 2
duets – one with Mohammed Rafi and another with Shamshad Begum.
Naushad used Mukesh’s voice
for only 10 songs across 3 films: Mela (1948) ("Gaaye Ja Geet Milan
Ke"), Anokhi Ada (1948) (5 songs), and 4 solos in Andaz (1949).
At a time when the pairings Raj Kapoor–Mukesh and Dilip
Kumar–Mohammed Rafi was well-established, Naushad took the bold step of
using Mukesh's voice for Dilip Kumar and Rafi’s voice for Raj Kapoor
in Andaz, and it did wonders.
Naina (Nargis) is the only
daughter of a wealthy father – pampered, raised with love, fond of horse
riding. In an accident, she’s saved by Dilip (Dilip Kumar). They become
friends, and over time, Dilip falls in love with Naina. But Naina is unaware of
his feelings, as she is deeply in love with Rajan (Raj Kapoor). During
this time, Naina’s father passes away, leaving her devastated. When Rajan
returns from abroad, he comforts her. Observing their behaviour, Dilip realizes
they are in love, which leaves Dilip heart-broken.
Before we watch the song,
understanding the emotional state of all three characters is important:
Rajan has just returned from abroad and is thrilled to meet Naina. She’s
already told him a lot about her friend Dilip. Still, upon meeting him, Rajan
feels a slight doubt about Dilip and Naina’s relationship. Naina is overjoyed
to see Rajan and unaware of Dilip’s feelings. Dilip, however, feels insecure
with Rajan’s return – he fears Rajan will take Naina away from him, and that
Naina has hurt him by not revealing her love for Rajan. At this delicate
moment, Rajan and Naina request Dilip to sing a song at the piano. And thus
begins a heartbreakingly beautiful song sung by Mukesh. His song becomes
a subtle confession of pain, layered with complex glances and emotions.
Rajan had asked Dilip to sing a
romantic song. Instead, he sings “Toote Na Dil, Toote Na...” (Let the
heart not break...), leaving Rajan slightly stunned and staring at him.
Dilip forces a smile, glancing between Naina and Rajan – if you pay attention
to the lyrics and expressions at this point, you'll notice the subtle emotions.
When Dilip looks at Naina, his face seems to ask, “Why did you deceive me?”
And when he looks at Rajan, his gaze carries a silent accusation: “You’re a
thief”. That piercing stare could cut right through one’s heart. Dilip
Kumar’s acting is exceptional here. Normally, I find him a bit
theatrical; but in this film, his performance is completely natural.
Nargis and Raj Kapoor match him with equally powerful expressions. Their facial
acting is worth watching. All three characters are so strong that you stay
glued to the screen. It’s almost impossible to decide whose performance is
superior. The credit for drawing out such natural acting from them goes to director
Mehboob Khan.
Speaking of the song – Naushad
composed it in Raag Bhairavi. This song foreshadows upcoming events in
the film. Majrooh’s lyrics are pure gold, and Mukesh pours his soul, portraying
Dilip’s sorrow, into the song with his deep, resonant voice. Since Dilip
Kumar was a singer himself, he executed all the subtle nuances beautifully –
which probably made the editor’s job easier. The instrumentation includes Piano,
Violin, Dholak, and what sounds like Mandolin pieces – Naushad created a truly
sublime composition. All the songs in the film are phenomenal. In fact,
Mukesh’s songs from this film can easily be counted among the top 10–20
songs of his career. Examples include: "Jhoom Jhoom Ke Nacho
Aaj," "Tu Kahe Agar Jeevan Bhar," and "Hum Aaj Kahin
Dil Kho Baithe."
So, let’s listen to this
magnificent song.
Do share your thoughts afterward.
If you liked it, pass it along.
Thank you.